मुंबई ः भारतीय रिझर्व्ह बँकेने सातारा येथील अजिंक्यतारा सहकारी बँकेवर लागू केलेल्या निर्बंधांत ३० सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. बँकिंग नियमन कायदा,१९४९च्या कलम ३५अ अंतर्गत हे निर्बंध लावण्यात आले होते. ३० सप्टेंबर २०१५मध्ये हे निर्बंध लावण्यात आले. या निर्बंधांची मुदत २९ मार्च रोजी संपली होती. त्यानंतर बँकेचा आर्थिक आढावा घेऊन हे निर्बंध आणखी सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आले आहेत. मात्र, यामुळे बँकेच्या सुदारलेल्या आर्थिक स्थितीवर रिझर्व्ह बँक समाधानी आहे, असे कोणी समजू नये असे रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
'अजिंक्यतारा'च्या निर्बंधांत वाढ
भारतीय रिझर्व्ह बँकेने सातारा येथील अजिंक्यतारा सहकारी बँकेवर लागू केलेल्या निर्बंधांत ३० सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे.
Maharashtra Times 4 Apr 2016, 3:00 am