अ‍ॅपशहर

'पद्मभूषण'साठी मी अपात्र! जाणून घ्या उद्योगपती आनंद महिंद्रा असं का म्हणाले...

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते देशातील अनेक नामवंत आणि कर्तृत्ववान व्यक्तींना पद्म पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती भवनात हा समारंभ नुकताच पार पडला.

guest Ashish-Narayan-Kadam | Lipi 10 Nov 2021, 12:23 pm
नवी दिल्ली : देशाच्या प्रमुख नागरी पुरस्कारांचा वितरण सोहळा नुकताच पार पडला. राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमात ७ जणांना पद्मविभूषण, १० जणांना पद्मभूषण तर १०२ जणांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आपल्या असामान्य कर्तृत्वाच्या जोरावर देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी बजावणाऱ्या सामान्य नागरिकांपासून ते देशातील प्रसिद्ध अशा व्यक्तींचा यात समावेश होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम anand mahindra says felt undeserving of padma award tweet viral
'पद्मभूषण'साठी मी अपात्र! जाणून घ्या उद्योगपती आनंद महिंद्रा असं का म्हणाले...


व्यवसाय आणि उद्योगातील योगदानाबद्दल आनंद महिंद्रा सन्मानित
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले. व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातील योगदानाबद्दल आनंद महिंद्रा यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आनंद महिंद्रा यांच्या नेतृत्वाखाली महिंद्रा समूहाने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑटोमोबाईलपासून ते आयटी आणि एरोस्पेसपर्यंत अनेक प्रमुख औद्योगिक क्षेत्रांमध्ये स्वतःचा आणि देशाचा नावलौकिक मिळवला आहे.

पुरस्काराचे श्रेय सर्व महिंद्रावासीयांना
राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी यासंबंधी एक ट्विट केलं असून अनेकांची मने जिंकली आहेत. महिंद्रांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, "पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल सर्वांचे आभार. एक जुनी म्हण आहे - जर तुम्हाला कुंपणावर कासव दिसले, तर ते स्वतःहून तिथे पोहोचणार नाही, याची खात्री आहे. त्याचप्रमाणे मी सर्व महिंद्रावासीयांच्या योगदानामुळे इथपर्यंत पोहोचलो आहे.''
सोने खरेदीचे अस्सल बिल कसे असते? सराफाकडून मिळणाऱ्या पावतीमध्ये तपासा या गोष्टी
आनंद महिंद्रा यांनी आपल्या दुसर्‍या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "सध्याच्या सरकारने पद्म पुरस्कार विजेत्यांच्या यादीत परिवर्तनीय बदल केला. समाज आणि देशाच्या सुधारणेत अतुलनीय योगदान देणाऱ्या देशातील तळागाळातून आलेल्या लोकांवर लक्ष केंद्रित केले आहे. या यादीत सामील होण्याइतपत मी योग्यतेचा नाही, अशा नम्र भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

इंधन दर ; जाणून घ्या आजचा तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचा भाव
पद्म पुरस्कारासाठी अपात्र
आनंद महिंद्रांनी आपल्या दोन ट्विटमधून दोन मोठे संदेश दिले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी सांगितले आहे की, ज्यासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, ते काम पूर्ण करणारे ते एकमेव व्यक्ती नाहीत. त्यांना या सन्मानासाठी पात्र बनवण्यासाठी महिंद्राशी संबंधित असलेल्या सर्व लोकांचे सहकार्य मिळाले आहे. तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, यापूर्वीच्या सर्व सरकारांमध्ये केवळ त्या व्यक्तींनाच पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, जे आधीच मोठे व्यक्तिमत्त्व होते. सध्याच्या सरकारने देशाच्या विकासात योगदान देणाऱ्या तळागाळातील लोकांचा गौरव केला. त्यामुळे पद्म पुरस्काराच्या यादीत सामील होण्यासाठी स्वत: अपात्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज