अ‍ॅपशहर

अपना बँक झाली ५० वर्षांची!

गिरणी कामगारांनी स्थापन केलेल्या अपना सहकारी बँकेने सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे.

Maharashtra Times 27 Mar 2017, 3:00 am
मुंबई ः गिरणी कामगारांनी स्थापन केलेल्या अपना सहकारी बँकेने सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. २९ मार्च १९६८ रोजी गिरणी कामगारांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी अस्तित्वात आलेल्या या बँकेचा सुवर्ण महोत्सवी शुभारंभ कार्यक्रम मंगळवारी (२८ मार्च) येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम apna bank enters into 50th year
अपना बँक झाली ५० वर्षांची!


बँकेच्या वाटचालीबद्दल अध्यक्ष दत्ताराम चाळके यांनी सांगितले, मार्च २००८पर्यंत केवळ १३ शाखा असणाऱ्या या बँकेच्या आज ८१ शाखा आहेत. एकूण व्यवसायाचा पाच हजार कोटींचा टप्पा बँकेने ओलांडला आहे. अपना बँकेने मालाडमधील केअर सहकारी बँक, सांगलीतील आष्टा अर्बन सहकारी बँक, कोल्हापूर येथील श्री बलभीम सहकारी बँक या तीन बँका स्वतःत यशस्वीरीत्या विलीन करून घेतल्या. या बँकांतील कर्मचाऱ्यांनाही अपना बँकेने सामावून घेतले आहे. अपना सहकारी बँकेला रिझर्व्ह बँकेने ऑक्टोबर २०१५मध्ये मल्टिस्टेट शेड्युल्ड बँकेचा दर्जा दिला. यामुळे कर्नाटक, गुजरात व गोवा येथे शाखाविस्ताराची बँकेला अनुमती देण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज