म. टा. प्रतिनिधी, मुंबई
सहकाराचा हेतू किती जपला आहे यावर सहकारी बँकेचे यश अवलंबून असते आणि या निकषावर अपना बँक शंभर टक्के यशस्वी आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी येथे काढले. अपना सहकारी बँकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. समाजातील विषमता दूर करण्यासाठी सहकाराला पर्याय नाही. त्यामुळे या क्षेत्राला चांगले दिवस येण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी झटले पाहिजे व या बँकेने अंगिकारलेल्या मार्गांचा अवलंब करायला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सहकारी बँकांमध्ये समाजात बदल घडविण्याची क्षमता आहे. या बँकांनी तळागाळात फार मोलाचे कार्य केले आहे. सर्व सहकारी बँकांनी त्यांचे चांगले कार्य लोकांसमोर मांडण्याची गरज आहे. यासाठी सहकारी बँकांचा एक मंच स्थापन करून अपना बँकेचे अध्यक्ष दत्ताराम चाळके यांनी त्याचे नेतृत्व करावे, असे आवाहनही प्रभू यांनी केले. या कार्यक्रमाला केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते, खासदार आनंद अडसूळ, ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. जी. जी. पारिख, आमदार कालिदास कोळंबकर, प्रसाद लाड, अजय चौधरी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपना बँकेचे अध्यक्ष दत्ताराम चाळके हे होते. चाळके म्हणाले की, अपना बँकेने गेल्या ५० वर्षांत समाजातील आर्थिक दुर्बलांसाठी निष्ठेने काम केले आहे. बँकेने अनेक उद्योजक घडवले आहेत. तसेच, सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेतला आहे. या बँकेत तंत्रज्ञानावर आधारित सर्व सेवा उपलब्ध असून लवकरच नेटबँकिंग, भारत बिल भरो अॅप या सुविधाही सुरू होतील. या कार्यक्रमाला बँकेचे सभासद, ग्राहक, संचालक, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहकाराचा हेतू किती जपला आहे यावर सहकारी बँकेचे यश अवलंबून असते आणि या निकषावर अपना बँक शंभर टक्के यशस्वी आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी येथे काढले. अपना सहकारी बँकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. समाजातील विषमता दूर करण्यासाठी सहकाराला पर्याय नाही. त्यामुळे या क्षेत्राला चांगले दिवस येण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी झटले पाहिजे व या बँकेने अंगिकारलेल्या मार्गांचा अवलंब करायला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सहकारी बँकांमध्ये समाजात बदल घडविण्याची क्षमता आहे. या बँकांनी तळागाळात फार मोलाचे कार्य केले आहे. सर्व सहकारी बँकांनी त्यांचे चांगले कार्य लोकांसमोर मांडण्याची गरज आहे. यासाठी सहकारी बँकांचा एक मंच स्थापन करून अपना बँकेचे अध्यक्ष दत्ताराम चाळके यांनी त्याचे नेतृत्व करावे, असे आवाहनही प्रभू यांनी केले. या कार्यक्रमाला केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते, खासदार आनंद अडसूळ, ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. जी. जी. पारिख, आमदार कालिदास कोळंबकर, प्रसाद लाड, अजय चौधरी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपना बँकेचे अध्यक्ष दत्ताराम चाळके हे होते. चाळके म्हणाले की, अपना बँकेने गेल्या ५० वर्षांत समाजातील आर्थिक दुर्बलांसाठी निष्ठेने काम केले आहे. बँकेने अनेक उद्योजक घडवले आहेत. तसेच, सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेतला आहे. या बँकेत तंत्रज्ञानावर आधारित सर्व सेवा उपलब्ध असून लवकरच नेटबँकिंग, भारत बिल भरो अॅप या सुविधाही सुरू होतील. या कार्यक्रमाला बँकेचे सभासद, ग्राहक, संचालक, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.