वृत्तसंस्था, नवी दिल्ली
केंद्र सरकारने सार्वजनिक बँकांना मार्गदर्शन करणाऱ्या बँक बोर्ड ब्यूरोचे मजबुतीकरण करावे तसेच, थकित कर्जांच्या समस्येशी झुंजण्यासाठी ‘मत्ता पुनरुज्जीवन बँके’ची (अॅसेट रिव्हायव्हल बँक) स्थापना करावी, असे मत उद्योगांची शिखर संघटना असणाऱ्या ‘असोचेम’ने व्यक्त केले.
‘मत्ता पुनरुज्जीवन बँक’ या (अॅसेट रिव्हायव्हल बँक) स्पेशल पर्पझ व्हेइकलच्या (एसपीव्ही) माध्यमातून बँकांनी कर्जदारांशी नेमके कसे व्यवहार करावेत, तोट्याचे प्रमाण कमी कसे करावे या विषयीचे मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे,’ असेही ‘असोचेम’तर्फे प्रसिद्ध निवेदनात नमूद केले आहे. केंद्र सरकारने बँकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्याची आवश्यकता असून, कर्जांची पुनर्रचना करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. पोलाद, बांधकाम आणि ऊर्जा क्षेत्रात मंदी असल्याने कर्जदारांकडून कर्जाच्या रकमेची वसुली जवळपास थांबली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कॅग, केंद्रीय दक्षता आयोग आणि सीबीआय यांचे अभिप्राय बाजूला सारून बँकाना हवी ती मदत करण्याची आवश्यकता असल्याचेही ‘असोचेम’ने नमूद केले आहे.
‘सध्या बँकांची प्राथमिकता थकित कर्जे बाजूला सारून ताळेबंद स्वच्छ करण्याला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अधिकाधिक भांडवली गुंतवणूक करून बँकांना पुरेशी मजबुती देण्याची गरज आहे,’ असेही ‘असोचेम’ने सांग्तले आहे.
केंद्र सरकारने सार्वजनिक बँकांना मार्गदर्शन करणाऱ्या बँक बोर्ड ब्यूरोचे मजबुतीकरण करावे तसेच, थकित कर्जांच्या समस्येशी झुंजण्यासाठी ‘मत्ता पुनरुज्जीवन बँके’ची (अॅसेट रिव्हायव्हल बँक) स्थापना करावी, असे मत उद्योगांची शिखर संघटना असणाऱ्या ‘असोचेम’ने व्यक्त केले.
‘मत्ता पुनरुज्जीवन बँक’ या (अॅसेट रिव्हायव्हल बँक) स्पेशल पर्पझ व्हेइकलच्या (एसपीव्ही) माध्यमातून बँकांनी कर्जदारांशी नेमके कसे व्यवहार करावेत, तोट्याचे प्रमाण कमी कसे करावे या विषयीचे मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे,’ असेही ‘असोचेम’तर्फे प्रसिद्ध निवेदनात नमूद केले आहे. केंद्र सरकारने बँकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्याची आवश्यकता असून, कर्जांची पुनर्रचना करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. पोलाद, बांधकाम आणि ऊर्जा क्षेत्रात मंदी असल्याने कर्जदारांकडून कर्जाच्या रकमेची वसुली जवळपास थांबली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कॅग, केंद्रीय दक्षता आयोग आणि सीबीआय यांचे अभिप्राय बाजूला सारून बँकाना हवी ती मदत करण्याची आवश्यकता असल्याचेही ‘असोचेम’ने नमूद केले आहे.
‘सध्या बँकांची प्राथमिकता थकित कर्जे बाजूला सारून ताळेबंद स्वच्छ करण्याला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अधिकाधिक भांडवली गुंतवणूक करून बँकांना पुरेशी मजबुती देण्याची गरज आहे,’ असेही ‘असोचेम’ने सांग्तले आहे.