अ‍ॅपशहर

पुढील दशकाअखेर भारत ठरेल तिसरी महासत्ता

वृत्तसंस्था, नवी दिल्लीभारतीय अर्थव्यवस्था ही मोठी भरारी मारण्याच्या पवित्र्यात असून २०३०पर्यंत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरेल, ...

Maharashtra Times 16 Jul 2018, 4:00 am

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारतीय अर्थव्यवस्था ही मोठी भरारी मारण्याच्या पवित्र्यात असून २०३०पर्यंत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरेल, असा विश्वास आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी व्यक्त केला. २०३०पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था १० लाख कोटी अमेरिकी डॉलरची होईल, असे भाकीतही त्यांनी व्यक्त केले. द इन्स्टिट्युट ऑफ कॉस्ट अकाऊंटण्टस ऑफ इंडियाच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत. आणखी चांगले दिवस येऊ घातले असून २०३०पर्यंत जगात तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेचा मान आपल्याला लाभेल, असे ते म्हणाले.

स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या चाळीस वर्षांत आपली अर्थव्यवस्था फार तर साडेतीन टक्क्यांनी वाढली. मात्र आता आपण सात ते आठ टक्क्यांच्या वाढीचे उद्दिष्ट आखले आहे. आठ टक्के वाढीलाही गवसणी घालणे शक्य नाही. म्हणूनच पुढील दशकाच्या अखेरपर्यंत आपण तिसरी जागतिक महासत्ता ठरू शकू, असे त्यांनी नमूद केले.

विक्रमी वाढ

गेल्या तिमाहीमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेने ७.७ टक्क्यांचा विक्रमी विकासदर गाठला आहे. गेल्या सात तिमाहींमधील हा सर्वोच्च विकासदर आहे. सरकारकडून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आल्याने हा स्तर गाठल्याचे मानले जात आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज