फायबॅक-२०१६ परिषदेत डॉ. रघुराम राजन यांचे आवाहन
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
देशातील बँका प्रकल्पांना कर्जे देऊन जोखीम पत्करण्याऐवजी किरकोळ कर्जे किंवा वैयक्तिक कर्जे देऊन सुरक्षित बँकिंग करताना दिसत आहेत. असा व्यवसाय बँकिंग क्षेत्रासाठी मारक असून बँकांनी मोठी कर्जे देणे आणि तीही मोठ्या प्रकल्पांसाठी देणे गरजेचे आहे, असे आवाहन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी येथे सांगितले. फिक्की औद्योगिक संघटना आणि इंडियन बँक्स असोसिएशन (आयबीए) यांनी संयुक्तरीत्या आयोजित फायबॅक-२०१६ परिषदेत उद्घाटनपर भाषण करताना ते बोलत होते.
बँकांनी मोठ्या प्रकल्पांना कर्जे देताना आपापल्या चालू खाते व बचत खाते अर्थात कासा ठेवींचा आढावा घ्यावा. बँकांमध्ये मोठ्या कर्जांचे निर्णय कर्जसमिती घेते. असे असले तरीही संबंधित बँकेतील वरिष्ठ सदस्याने त्या कर्ज प्रस्तावावर स्वतःचे नाव टाकणे गरजेचे आहे, जेणेकरून त्या कर्जाची प्राथमिक जबाबदारी त्या सदस्यावर टाकता येईल. याचाच अर्थ तो सदस्य या कर्जासाठी उत्तरदायी असेल. यामुळे थकित कर्जे कमी होण्यास मदत मिळेल. यामुळे साहजिकच प्रत्येक मोठ्या प्रकल्पाचा बारकाईने अभ्यास संबंधित बँकेकडून केला जाईल, अशी अपेक्षा डॉ. राजन यांनी व्यक्त केली.
परिषदेच्या सुरुवातीला फिक्कीचे अध्यक्ष व अंबुजा निओतिया समूहाचे अध्यक्ष हर्षवर्धन निओतिया यांनी आपल्या प्रास्ताविकात बँकिंग व्यवसायापुढील आव्हाने सांगितली. बासेल-३ निकष पूर्ण करण्यासाठी भांडवलाची उभारणी, अनुत्पादक मत्ता (स्ट्रेस्ड अॅसेट्स), सायबर सुरक्षा व फिनटेक कंपन्यांची बँकिंग व्यवसायातील प्रवेश ही पारंपरिक बँकिंग व्यवसायापुढील आव्हाने असल्याचे निओतिया यांनी सांगितले. यावेळी बोस्टन कन्सल्टिंग समूहाचे संचालक सौरभ त्रिपाठी यांनी 'न्यू होरायझन इन इंडियन बँकिंग' या विषयावर सादरीकरण केले.
..
बँकांपुढील आव्हाने -
-कर्जे देताना अधिक खबरदारी घेणे
-गुणवत्तेतील तफावत दूर करणे
-मधल्या फळीतील व्यवस्थापन कमी करणे
-प्रशिक्षणावर अधिक भर देणे
-स्थानिक पातळीवर नोकर भरती करणे
-ग्राहकांशी असलेले संबंध आणखी दृढ करणे
-तंत्रज्ञानावर अधिक भर देणे
..
सायबर सुरक्षा यंत्रणा
बँकांना सर्वात मोठा धोका सायबर हल्ल्यांपासून आहे. हा धोका टाळण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या साह्याने बँकांनी आपली सायबर सुरक्षा यंत्रणा अदिक सक्षम करावी, असे आवाहन डॉ. रघुराम राजन यांनी केले. सायबर सुरक्षा यंत्रणा सक्षम करण्यासाठी रिझर्व्ह बँकेचेही प्रयत्न सुरू असल्याचे राजन म्हणाले. बँकेचे अॅक्सेस पॉइंट्स विनासुरक्षा राहणे, अनेक लोकांकडून पासवर्ड दिला-घेतला जाणे व सॉफ्टवेअरकडून दक्षता नीट ठेवली न जाणे यामुळेही सायबर धोका निर्माण होण्याची शक्यता वाढते, याकडे राजन यांनी लक्ष वेधले.
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
देशातील बँका प्रकल्पांना कर्जे देऊन जोखीम पत्करण्याऐवजी किरकोळ कर्जे किंवा वैयक्तिक कर्जे देऊन सुरक्षित बँकिंग करताना दिसत आहेत. असा व्यवसाय बँकिंग क्षेत्रासाठी मारक असून बँकांनी मोठी कर्जे देणे आणि तीही मोठ्या प्रकल्पांसाठी देणे गरजेचे आहे, असे आवाहन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी येथे सांगितले. फिक्की औद्योगिक संघटना आणि इंडियन बँक्स असोसिएशन (आयबीए) यांनी संयुक्तरीत्या आयोजित फायबॅक-२०१६ परिषदेत उद्घाटनपर भाषण करताना ते बोलत होते.
बँकांनी मोठ्या प्रकल्पांना कर्जे देताना आपापल्या चालू खाते व बचत खाते अर्थात कासा ठेवींचा आढावा घ्यावा. बँकांमध्ये मोठ्या कर्जांचे निर्णय कर्जसमिती घेते. असे असले तरीही संबंधित बँकेतील वरिष्ठ सदस्याने त्या कर्ज प्रस्तावावर स्वतःचे नाव टाकणे गरजेचे आहे, जेणेकरून त्या कर्जाची प्राथमिक जबाबदारी त्या सदस्यावर टाकता येईल. याचाच अर्थ तो सदस्य या कर्जासाठी उत्तरदायी असेल. यामुळे थकित कर्जे कमी होण्यास मदत मिळेल. यामुळे साहजिकच प्रत्येक मोठ्या प्रकल्पाचा बारकाईने अभ्यास संबंधित बँकेकडून केला जाईल, अशी अपेक्षा डॉ. राजन यांनी व्यक्त केली.
परिषदेच्या सुरुवातीला फिक्कीचे अध्यक्ष व अंबुजा निओतिया समूहाचे अध्यक्ष हर्षवर्धन निओतिया यांनी आपल्या प्रास्ताविकात बँकिंग व्यवसायापुढील आव्हाने सांगितली. बासेल-३ निकष पूर्ण करण्यासाठी भांडवलाची उभारणी, अनुत्पादक मत्ता (स्ट्रेस्ड अॅसेट्स), सायबर सुरक्षा व फिनटेक कंपन्यांची बँकिंग व्यवसायातील प्रवेश ही पारंपरिक बँकिंग व्यवसायापुढील आव्हाने असल्याचे निओतिया यांनी सांगितले. यावेळी बोस्टन कन्सल्टिंग समूहाचे संचालक सौरभ त्रिपाठी यांनी 'न्यू होरायझन इन इंडियन बँकिंग' या विषयावर सादरीकरण केले.
..
बँकांपुढील आव्हाने -
-कर्जे देताना अधिक खबरदारी घेणे
-गुणवत्तेतील तफावत दूर करणे
-मधल्या फळीतील व्यवस्थापन कमी करणे
-प्रशिक्षणावर अधिक भर देणे
-स्थानिक पातळीवर नोकर भरती करणे
-ग्राहकांशी असलेले संबंध आणखी दृढ करणे
-तंत्रज्ञानावर अधिक भर देणे
..
सायबर सुरक्षा यंत्रणा
बँकांना सर्वात मोठा धोका सायबर हल्ल्यांपासून आहे. हा धोका टाळण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या साह्याने बँकांनी आपली सायबर सुरक्षा यंत्रणा अदिक सक्षम करावी, असे आवाहन डॉ. रघुराम राजन यांनी केले. सायबर सुरक्षा यंत्रणा सक्षम करण्यासाठी रिझर्व्ह बँकेचेही प्रयत्न सुरू असल्याचे राजन म्हणाले. बँकेचे अॅक्सेस पॉइंट्स विनासुरक्षा राहणे, अनेक लोकांकडून पासवर्ड दिला-घेतला जाणे व सॉफ्टवेअरकडून दक्षता नीट ठेवली न जाणे यामुळेही सायबर धोका निर्माण होण्याची शक्यता वाढते, याकडे राजन यांनी लक्ष वेधले.