अ‍ॅपशहर

'आधार'मुळे वाचले ९० हजार कोटी

वृत्तसंस्था, हैदराबादआधार क्रमांकाच्या माध्यमातून विविध सरकारी योजनांतील लाभार्थ्यांना होणाऱ्या थेट लाभ हस्तांतरणामुळे (डायरेक्ट बेनिफिट ...

Maharashtra Times 13 Jul 2018, 4:00 am

वृत्तसंस्था, हैदराबाद

आधार क्रमांकाच्या माध्यमातून विविध सरकारी योजनांतील लाभार्थ्यांना होणाऱ्या थेट लाभ हस्तांतरणामुळे (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर) सरकारच्या तब्बल ९० हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे. 'आधार'चे नियमन करणाऱ्या यूआयडीएआयचे (युनिक आयडेण्टिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया) अध्यक्ष जे. सत्यनारायण यांनी येथे एका कार्यक्रमात ही माहिती दिली.

सत्यनारायण म्हणाले की, आधार कार्डच्या एकूण प्रक्रियेवर व अंमलबजावणीसाठी सरकारने फार तर १० हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र या कार्डच्या प्रभावी वापरामुळे ३१ मार्च २०१८पर्यंत सरकारचे ९० हजार कोटी रुपये वाचले आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अनेक योजनांतील अनुदान व सवलतींची रक्कम आधारच्या माध्यमातून थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जात आहे. या पद्धतीमुळे पारदर्शक व्यवहार होत आहेत. यातून बनावट व दुहेरी लाभ घेणाऱ्या खातेदारांना चाप बसला आहे व सरकारी पैशांची मोठ्या प्रमाणावर बचत होत आहे.

माहिती सुरक्षित

आतापर्यंत १२१ कोटी नागरिकांनी आधार कार्ड काढले असून तीन कोटी नागरिक आधारच्या माध्यमातून ई व्यवहार करीत आहेत. आधारसाठी संकलित करण्यात येणारी माहिती ही पूर्णपणे सुरक्षित आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज