वृत्तसंस्था, मुंबई
मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी कमालीचा उत्साह दिसून आला. गुंतवणूकदारांनी सर्व प्रमुख सेक्टरमधील समभागांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्याने निर्देशांकाने ४८१ अंकांनी उसळी घेतली. दिवसअखेरीस निर्देशांक ३७५३५वर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकानेही चांगली कामगिरी नोंदवत १३३ अंकांची कमाई केली. हा निर्देशांक दिवसअखेरीस ११३०१वर स्थिरावला.
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने सोमवारी ३८२ अंकांची कमाई करत ३७ हजारांचा टप्पा पार केला होता. निर्देशांकाची ही सहा महिन्यांतील उच्चांकी कामगिरी ठरली होती. मंगळवारी यात ४८१ अंकांची भर पडल्याने निर्देशांकाने नवा विक्रमी स्तर गाठला. मंगळवारी भारती एअरटेलचा समभाग सर्वाधिक म्हणजे ४.६१ टक्क्यांनी वधारला. याशिवाय आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, एल अँड टी, सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रिज, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा आदींचे समभाग ३.६९ टक्क्यांपर्यंत उसळले.
तेजी कशामुळे?
गुंतवणूकदारांनी गेले दोन दिवस समभागखरेदीचा सपाटा लावल्याने निर्देशांकात तेजी आली आहे. विदेशी फंडांचा वाढता ओघ, रुपयाची बळकट स्थिती व आगामी निवडणुकीनंतर रालोआचेच सरकार पुन्हा सत्तेत येईल याची शक्यता बळावल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी (एफपीआय) भारतीय शेअर बाजाराकडे पुन्हा मोर्चा वळवल्याचे दिसत आहे. एफपीआयने सोमवारी ३,८१० कोटींचे तर, मंगळवारी सुमारे २,४७७ कोटी रुपयांचे समभाग विकत घेतले. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने चालू महिन्यात आतापर्यंत १,६६८ अंकांची कमाई केली आहे. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ५०८ अंकांनी वधारला आहे.
रुपयाही उच्चांकावर
अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती मंगळवारी आणखी बळकट झाली. मंगळवारी १८ पैशांनी वधारलेल्या रुपयाने ६९.७१ असा नवा दर नोंदवला. रुपयाचा हा गेल्या दोन महिन्यांतील उच्चांकी दर ठरला.
मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी कमालीचा उत्साह दिसून आला. गुंतवणूकदारांनी सर्व प्रमुख सेक्टरमधील समभागांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्याने निर्देशांकाने ४८१ अंकांनी उसळी घेतली. दिवसअखेरीस निर्देशांक ३७५३५वर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकानेही चांगली कामगिरी नोंदवत १३३ अंकांची कमाई केली. हा निर्देशांक दिवसअखेरीस ११३०१वर स्थिरावला.
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने सोमवारी ३८२ अंकांची कमाई करत ३७ हजारांचा टप्पा पार केला होता. निर्देशांकाची ही सहा महिन्यांतील उच्चांकी कामगिरी ठरली होती. मंगळवारी यात ४८१ अंकांची भर पडल्याने निर्देशांकाने नवा विक्रमी स्तर गाठला. मंगळवारी भारती एअरटेलचा समभाग सर्वाधिक म्हणजे ४.६१ टक्क्यांनी वधारला. याशिवाय आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, एल अँड टी, सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रिज, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा आदींचे समभाग ३.६९ टक्क्यांपर्यंत उसळले.
तेजी कशामुळे?
गुंतवणूकदारांनी गेले दोन दिवस समभागखरेदीचा सपाटा लावल्याने निर्देशांकात तेजी आली आहे. विदेशी फंडांचा वाढता ओघ, रुपयाची बळकट स्थिती व आगामी निवडणुकीनंतर रालोआचेच सरकार पुन्हा सत्तेत येईल याची शक्यता बळावल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी (एफपीआय) भारतीय शेअर बाजाराकडे पुन्हा मोर्चा वळवल्याचे दिसत आहे. एफपीआयने सोमवारी ३,८१० कोटींचे तर, मंगळवारी सुमारे २,४७७ कोटी रुपयांचे समभाग विकत घेतले. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने चालू महिन्यात आतापर्यंत १,६६८ अंकांची कमाई केली आहे. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ५०८ अंकांनी वधारला आहे.
रुपयाही उच्चांकावर
अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती मंगळवारी आणखी बळकट झाली. मंगळवारी १८ पैशांनी वधारलेल्या रुपयाने ६९.७१ असा नवा दर नोंदवला. रुपयाचा हा गेल्या दोन महिन्यांतील उच्चांकी दर ठरला.