अ‍ॅपशहर

बीएसएनएलचा पगार पुन्हा थकला

बीएसएनएल या सरकारी दूरसंचार कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा सप्टेंबरचा पगार अद्याप न झाल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र टाइम्स 18 Oct 2019, 4:00 am
ईटी वृत्त, नवी दिल्ली: बीएसएनएल या सरकारी दूरसंचार कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा सप्टेंबरचा पगार अद्याप न झाल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे. हा पगार दिवाळीपूर्वी देण्यात येईल, असे बीएसएनएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पी. के. पुरवार यांनी म्हटले आहे. महानगर टेलिफोन निगम लि.च्या कर्मचाऱ्यांनादेखील अद्याप गेल्या महिन्याचा पगार मिळालेला नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bsnl


बीएसएनएलमध्ये १.७६ लाख कर्मचारी असून या कंपनीच्या उत्पन्नापैकी ६५ ते ७० टक्के निधी पगार खात्यावरच खर्च होतो. गेल्या अनेक महिन्यांपासून या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात अनियमितता आहे. एमटीएनएलमध्येही हीच स्थिती आहे. १८ ऑक्टोबरपूर्वी पगार न झाल्यास उपोषण आंदोलन करण्याचा इशारा बीएसएनएलच्या कर्मचारी संघटनांनी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर पूरवार यांनी हे आश्वासन दिले.

बीएसएनएलच्या अंतर्गत उत्पन्न स्रोतांतून कर्मचाऱ्यांचे ८५० कोटी रुपयांचे पगार देयक भागवले जाईल, असे त्यांनी सांगितले. बीएसएनएलला दरमहा १,६०० कोटी रुपयांचे उत्पन्न होते, मात्र यातील मोठा हिस्सा हा कार्यगत व अनिवार्य खर्चांसाठी वापरला जातो. यामुळे पगार देयकांसाठी पुरेसा निधी उरत नाही. या कंपनीला मार्च २०१९ अखेरीस १३,८०४ कोटी रुपये निव्वळ तोटा झाला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज