अ‍ॅपशहर

साखर कारखान्यांना केंद्र सरकारचा दिलासा

​​ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देय असलेल्या थकीत रकमेमुळे त्रस्त असलेल्या साखर कारखानदारांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. साखर कारखान्यांतून घाऊकपणे विकल्या जाणाऱ्या साखरेच्या किमान विक्रीदरात सरकारने प्रतिकिलो दोन रुपये वाढ केली आहे. यामुळे हा किमान दर आता ३१ रुपये झाला आहे. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी गुरुवारी ही माहिती दिली.

महाराष्ट्र टाइम्स 15 Feb 2019, 4:00 am
नवी दिल्ली :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sugar


ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देय असलेल्या थकीत रकमेमुळे त्रस्त असलेल्या साखर कारखानदारांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. साखर कारखान्यांतून घाऊकपणे विकल्या जाणाऱ्या साखरेच्या किमान विक्रीदरात सरकारने प्रतिकिलो दोन रुपये वाढ केली आहे. यामुळे हा किमान दर आता ३१ रुपये झाला आहे. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी गुरुवारी ही माहिती दिली.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर कारखान्यांकडून एकूण २० हजार कोटी रुपये येणे आहे. घाऊक बाजारात विकल्या जाणाऱ्या साखरेचा भाव दोन रुपयांनी वाढवल्याने ही देणी फेडण्यास साखर कारखान्यांना मदत होणार आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरपर्यंतच्या चार महिन्यांत साखरेचे उत्पादन आठ टक्क्यांनी वाढून १८५ लाख टनांवर पोहोचले आहे. त्यातच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देय असलेल्या थकीत रकमेमुळे कारखाने त्रस्त आहेत. त्यावर केंद्र सरकारने दिलेला हा दिलासा मानला जात आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज