मुंबई ः चीनमधून जगभरात पसरत असलेल्या विषाणूचे गारुड मंगळवारीही भांडवल बाजारांवर कायम राहिले. परिणामी, दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १८८.२६ अंकांनी खाली येत ४०,९६६.८६ पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील ६३.२० अंकांनी घसरत १२,०५५.८० अंकांवर स्थिरावला. दिवसभरात भारती एअरटेलला सर्वाधिक फटका बसला. त्यापाठोपाठ टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज, मारुती, आयटीसी, नेस्ले इंडिया आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग गडगडले. भारतीय रुपयानेच काय तो दिलासा दिला आणि ते अमेरिकी डॉलरच्या तुलनेत १२ पैशांनी वधारला.
बाजारावर चिनी विषाणूचे गारुड
मुंबई ः चीनमधून जगभरात पसरत असलेल्या विषाणूचे गारुड मंगळवारीही भांडवल बाजारांवर कायम राहिले परिणामी, दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १८८...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Jan 2020, 4:00 am