अ‍ॅपशहर

५५ दिवसानंतर देशात उघडली ४.५ कोटी दुकाने; पण...

व्यापारी संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार ५५ दिवसांच्या लॉकडाऊनंतर आज दुकाने उघडली. अनेकांनी पहिल्या दिवशी साफसफाईला प्राधान्य दिले. बाजारपेठा सुरू झाल्या असल्या तरी फार कमी कर्मचारी कामावर आले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 May 2020, 5:06 pm
नवी दिल्ली: करोना व्हायरसची लागण रोखण्यासाठी देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून आजपासून थोडी सलवत देण्यात आली. यामुळे राजधानी नवी दिल्लीसह देशातील अन्य भागात बाजार खुले झाले. व्यापारी संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार ५५ दिवसांच्या लॉकडाऊनंतर आज दुकाने उघडली. अनेकांनी पहिल्या दिवशी साफसफाईला प्राधान्य दिले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Shops-Open


वाचा- विमान कंपन्यांनी बुकिंग सुरू केले; या तारखेपासून करता येणार प्रवास?

बाजारपेठा सुरू झाल्या असल्या तरी फार कमी कर्मचारी कामावर आले आहेत. शहरातील कामगार मोठ्या संख्येने गावी गेल्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. राजधानी दिल्लीत काम करणारे ७० टक्के कर्मचारी गावी गेल्यामुळे बाजारात शांतता होती. बाजारपेठा सुरू झाल्या असल्या तरी प्रत्यक्षात व्यवसाय काही झाला नाही.

वाचा- सोन्याच्या दरात उलथापालथ ; 'हा' आहे आजचा दर

सर्व दुकानदारांनी आणि व्यावसायिकांनी दुकाने सॅनिटायज करण्याचे काम सुरू केले. केंद्र आणि राज्य सरकारांनी सर्व व्यापाऱ्यांना मास्क आणि ग्लव्ज घालण्याचे आदेश दिले आहेत. तसे सोशल डिस्टसिंगचा नियम पाळण्यास सांगितले आहे. राजधानी दिल्लीत ऑड आणि इव्हन व्यवस्थेनुसार ५ लाख दुकाने उघडली आहेत.

कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) अध्यक्ष प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, गेल्या ५५ दिवसांपासून दुकाने बंद असल्यामुळे धुळ जमा झाली आहे. यामुळेच सर्व व्यापारी आणि दुकानदारांनी प्रथम साफसफाईला प्राधान्य दिले. अनेक दुकानातील माल आणि वस्तू खराब झाल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

वाचा- २० लाख कोटीत किती शून्य

दिल्लीतील ऑड आणि इव्ह व्यवस्थेला सर्वच व्यापाऱ्यांनी विरोध केल्याचे खंडेलवाल यांनी सांगितले. यामुळे ग्राहक जर एक दिवस बाजारात आला तर तो सर्व प्रकारच्या वस्तू विकत घेऊ शकणार नाही. कॅटने उपराज्यपाल अनिल बैजल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहून ही व्यवस्था बदलण्याची विनंती केली आहे. या पत्रात बाजारपेठ कशा पद्धतीने खुल्या कराव्यात याचा पर्यात कॅटने सांगितला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज