मुंबई : करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बँक खातेदारांनी १५ दिवसांत तब्बल ५३ हजार कोटी काढल्याची माहिती समोर आली आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार १३ मार्चच्या पंधरवड्यात ग्राहकांनी बँकांमधून काढलेली रक्कम मागील १६ महिन्यांतील उच्चांकी ठरली आहे.
भारतात करोनाचे रुग्ण वाढत असल्याने सरकारने युद्धपातळीवर उपायोजना सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॉक डाऊन जाहीर केला आहे. १४ एप्रिलपर्यंत देशभरात संचार बंदी स्वरूप स्थिती राहणार असून बँकांनी कामकाजाचा कालावधी कमी केला आहे. या घडामोडी पाहता ग्राहकांनी खात्यातून पैसे काढण्याला प्राधान्य दिले आहे.
कर्ज फेडीस मुदतवाढ : नेमका अर्थ काय ?
रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार १३ मार्चच्या पंधरवड्यात बाजारात २३ लाख कोटींचे चलन आहे. याच पंधरा दिवसात ग्राहकांनी बँक खात्यातून तब्बल ५३ हजार कोटी काढून घेतले आहे. दैनंदिन वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहक रोकड पर्यायाला पसंती देत आहेत, म्हणून मोठ्या प्रमाणात बँक खात्यातून पैसे काढण्यात आल्याचे ऍक्सिस बँकेचे अर्थतज्ज्ञ सौगाता भट्टाचार्य यांनी सांगितले. लॉक डाऊनच्या काळात रोकड पैशांअभावी अडचण होऊ नये, म्हणून ग्राहकांनी आधीच बँक खात्यातून पैसे काढून घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्जे होणार स्वस्त ; RBI ची व्याजदर कपात
रोकडची अचानक मागणी वाढल्याने पुरेशा प्रमाणात रोखता ठेवण्याबाबत बँकेकडून काळजी घेण्यात येत असल्याचे 'एसबीआय' समूहाचे मुख्य अर्थतज्ज्ञ एस. के घोष यांनी सांगितले. दरम्यान, प्रचंड प्रमाणात ग्राहकांनी पैसे काढून घेतल्याने बँकांच्या ठेवींवर विपरीत परिणाम होईल, असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
भारतात करोनाचे रुग्ण वाढत असल्याने सरकारने युद्धपातळीवर उपायोजना सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॉक डाऊन जाहीर केला आहे. १४ एप्रिलपर्यंत देशभरात संचार बंदी स्वरूप स्थिती राहणार असून बँकांनी कामकाजाचा कालावधी कमी केला आहे. या घडामोडी पाहता ग्राहकांनी खात्यातून पैसे काढण्याला प्राधान्य दिले आहे.
कर्ज फेडीस मुदतवाढ : नेमका अर्थ काय ?
रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार १३ मार्चच्या पंधरवड्यात बाजारात २३ लाख कोटींचे चलन आहे. याच पंधरा दिवसात ग्राहकांनी बँक खात्यातून तब्बल ५३ हजार कोटी काढून घेतले आहे. दैनंदिन वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहक रोकड पर्यायाला पसंती देत आहेत, म्हणून मोठ्या प्रमाणात बँक खात्यातून पैसे काढण्यात आल्याचे ऍक्सिस बँकेचे अर्थतज्ज्ञ सौगाता भट्टाचार्य यांनी सांगितले. लॉक डाऊनच्या काळात रोकड पैशांअभावी अडचण होऊ नये, म्हणून ग्राहकांनी आधीच बँक खात्यातून पैसे काढून घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्जे होणार स्वस्त ; RBI ची व्याजदर कपात
रोकडची अचानक मागणी वाढल्याने पुरेशा प्रमाणात रोखता ठेवण्याबाबत बँकेकडून काळजी घेण्यात येत असल्याचे 'एसबीआय' समूहाचे मुख्य अर्थतज्ज्ञ एस. के घोष यांनी सांगितले. दरम्यान, प्रचंड प्रमाणात ग्राहकांनी पैसे काढून घेतल्याने बँकांच्या ठेवींवर विपरीत परिणाम होईल, असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.