मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
नोटाबंदीच्या निर्णयातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने आणखी काही पावले उचलली आहेत. त्यानुसार रब्बी हंगामात आर्थिक कोंडी होऊ नये म्हणून नाबार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अर्थपुरवठा करण्यात येणार आहे. ही रोकड जिल्हा सहकारी बँकांमध्ये उपलब्ध होणार आहे. दरम्यान, रोख व्यवहारांऐवजी डिजिटल आर्थिक व्यवहारांवर सरकारचा भर राहणार असून त्याला पूरक असे अनेक निर्णयही सरकारने घेतले आहेत.
केंद्रीय अर्थ सचिव शक्तिकांत दास यांनी सरकारने गेल्या २४ तासांत घेतलेल्या निर्णयांची माहिती आज पत्रकार परिषदेत दिली. २१ हजार कोटी रुपये नाबार्डकडून सहकारी बँकांना दिले जातील. कृषी कर्जांसाठी बँकांची यादी तयार करण्यात आली आहे, असे दास यांनी सांगितले.
डिजिटल आर्थिक व्यवहारांवर भर
- पेटीएम (Paytm) सारख्या ई-वॉलेटमध्ये आता २० हजार रुपयांपर्यंत रक्कम जमा करण्याची मुभा असेल. आधी ही मर्यादा १० हजार इतकी होती.
- मोबाइलवरून केल्या जाणाऱ्या पेमेंट्सवर ३१ डिसेंबरपर्यंत शुल्क आकारलं जाणार नाही.
- ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंग तसेच क्रेडिक कार्डच्या वापरावर ३१ डिसेंबरपर्यंत सेवा कर नाही.
- रुपे (RuPay) कार्डसाठीचा स्विचिंग शुल्क यापुढे बंद
- सरकारकडून होणारी सर्व प्रकारची पेमेंट्स 'कॅशलेस' असतील.
'यूपीआय'बाबत दिली माहिती
यूनिफाइड पेमेंट इंटरफेस २० बँका लागू करत आहेत. कोणत्याही खातेधारकाने यूपीआय अॅप डाउनलोड करावं. ई-मेलसारखा एक फायनान्शिअल आयडी तिथे असेल. याद्वारे पैसा पाठवण्याबरोबरच पैशांची मागणीही करू शकता. त्यासाठी केवळ एक एसएमएस पाठवावा लागेल. विशेष म्हणजे त्यानंतर लगेचच पैसे तुम्हाला मिळतील. प्रत्येक बँकेचं स्वतंत्र यूपीआय अॅप असेल, अशी महत्त्वाची माहिती दास यांनी दिली.
अन्य ठळक बाबी...
- ८२ हजार एटीएमचे रिकॅलिब्रेशन पूर्ण झाले आहे. येत्या काही दिवसांत उरलेल्या सर्व एटीएमचे कॅलिब्रेशन पूर्ण होईल.
- देशभरातील १ लाख ५५ हजार पोस्ट ऑफिसमध्ये नव्या ५०० आणि २००० रुपयाच्या नव्या नोटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
- 'बिग बाजार'मध्ये २ हजार रुपयांपर्यंत रक्कम डेबिट/क्रेडिट कार्ड स्वाइप करून काढू शकता.
- लग्नासाठी अडीच लाख रुपये रक्कम बँक खात्यातून काढण्यासाठी असलेल्या अटींमध्ये सूट देण्यात येईल.
- १० हजार रुपयांपेक्षा जास्त रोकड हवी असेल तरच लेखी हमी द्यावी लागेल.
- बचत खातेधारकांना ३० डिसेंबरपर्यंत एटीएम शुल्क लागणार नाही. त्यामुळे दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून कितीही वेळा पैसे काढले तरी त्यावर शुल्क कापून जाणार नाही.
नोटाबंदीच्या निर्णयातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने आणखी काही पावले उचलली आहेत. त्यानुसार रब्बी हंगामात आर्थिक कोंडी होऊ नये म्हणून नाबार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अर्थपुरवठा करण्यात येणार आहे. ही रोकड जिल्हा सहकारी बँकांमध्ये उपलब्ध होणार आहे. दरम्यान, रोख व्यवहारांऐवजी डिजिटल आर्थिक व्यवहारांवर सरकारचा भर राहणार असून त्याला पूरक असे अनेक निर्णयही सरकारने घेतले आहेत.
केंद्रीय अर्थ सचिव शक्तिकांत दास यांनी सरकारने गेल्या २४ तासांत घेतलेल्या निर्णयांची माहिती आज पत्रकार परिषदेत दिली. २१ हजार कोटी रुपये नाबार्डकडून सहकारी बँकांना दिले जातील. कृषी कर्जांसाठी बँकांची यादी तयार करण्यात आली आहे, असे दास यांनी सांगितले.
डिजिटल आर्थिक व्यवहारांवर भर
- पेटीएम (Paytm) सारख्या ई-वॉलेटमध्ये आता २० हजार रुपयांपर्यंत रक्कम जमा करण्याची मुभा असेल. आधी ही मर्यादा १० हजार इतकी होती.
- मोबाइलवरून केल्या जाणाऱ्या पेमेंट्सवर ३१ डिसेंबरपर्यंत शुल्क आकारलं जाणार नाही.
- ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंग तसेच क्रेडिक कार्डच्या वापरावर ३१ डिसेंबरपर्यंत सेवा कर नाही.
- रुपे (RuPay) कार्डसाठीचा स्विचिंग शुल्क यापुढे बंद
- सरकारकडून होणारी सर्व प्रकारची पेमेंट्स 'कॅशलेस' असतील.
'यूपीआय'बाबत दिली माहिती
यूनिफाइड पेमेंट इंटरफेस २० बँका लागू करत आहेत. कोणत्याही खातेधारकाने यूपीआय अॅप डाउनलोड करावं. ई-मेलसारखा एक फायनान्शिअल आयडी तिथे असेल. याद्वारे पैसा पाठवण्याबरोबरच पैशांची मागणीही करू शकता. त्यासाठी केवळ एक एसएमएस पाठवावा लागेल. विशेष म्हणजे त्यानंतर लगेचच पैसे तुम्हाला मिळतील. प्रत्येक बँकेचं स्वतंत्र यूपीआय अॅप असेल, अशी महत्त्वाची माहिती दास यांनी दिली.
अन्य ठळक बाबी...
- ८२ हजार एटीएमचे रिकॅलिब्रेशन पूर्ण झाले आहे. येत्या काही दिवसांत उरलेल्या सर्व एटीएमचे कॅलिब्रेशन पूर्ण होईल.
- देशभरातील १ लाख ५५ हजार पोस्ट ऑफिसमध्ये नव्या ५०० आणि २००० रुपयाच्या नव्या नोटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
- 'बिग बाजार'मध्ये २ हजार रुपयांपर्यंत रक्कम डेबिट/क्रेडिट कार्ड स्वाइप करून काढू शकता.
- लग्नासाठी अडीच लाख रुपये रक्कम बँक खात्यातून काढण्यासाठी असलेल्या अटींमध्ये सूट देण्यात येईल.
- १० हजार रुपयांपेक्षा जास्त रोकड हवी असेल तरच लेखी हमी द्यावी लागेल.
- बचत खातेधारकांना ३० डिसेंबरपर्यंत एटीएम शुल्क लागणार नाही. त्यामुळे दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून कितीही वेळा पैसे काढले तरी त्यावर शुल्क कापून जाणार नाही.