अ‍ॅपशहर

एकत्रीकरणामुळे बँकांची सक्षमता वाढेल

एकत्रीकरणामुळे या बँकांची सक्षमता वाढेल. तसेच, त्यांच्या कर्ज देण्याच्या क्षमतेमध्येही वाढ होईल, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला.

Maharashtra Times 18 Sep 2018, 4:00 am
नवी दिल्ली : एकत्रीकरणामुळे या बँकांची सक्षमता वाढेल. तसेच, त्यांच्या कर्ज देण्याच्या क्षमतेमध्येही वाढ होईल, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला. या बँकांची स्थिती काहीशी खालावलेली होती. त्यामुळे उद्योगजगताकडून केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीवर विपरित परिणाम होत होता. मात्र या एकत्रीकरणानंतर हे चित्र बदलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dena vijaya and bank of baroda to merge to form indias 3rd largest bank
एकत्रीकरणामुळे बँकांची सक्षमता वाढेल


या बँकांची संचालक मंडळे या एकत्रीकरणाची प्रक्रिया पूर्ण करतील, अशी माहिती आर्थिक सेवा विभागाचे सचिव राजीव कुमार यांनी दिली. या निर्णयामुळे या बँकांच्या दैनंदिन कामकाजात प्रचंड सुधारणा होईल. ग्राहकसेवेतही सकारात्मक परिणाम दिसून येतील, असे ते म्हणाले. सरकारी बँकांची आर्थिक स्थिती सुधारत असून शेवटच्या तिमाहीमध्ये एकूण २१ हजार कोटी रुपयांच्या थकीत कर्जाची वसुली झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्येही बँकांनी ३६,५५१ कोटी रुपयांची वसुली केली आहे. केंद्र सरकारने नव्याने अंमलात आणलेल्या दिवाळखोरीविरोधी कायद्याचा या वसुलीसाठी प्रभावी उपयोग होत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज