अ‍ॅपशहर

पीएसीएल गुंतवणूकदारांचे धरणे

पर्ल्स अर्थात पीएसीएल कंपनीने देशातील एकूण सहा कोटी गुंतवणूकदारांना तब्बल ६० हजार कोटी रुपयांना गंडा घातला आहे. या सर्व गुंतवणूकदारांना पैसे परत द्या असा आदेश भांडवल बाजार नियंत्रक सेबीने देऊनही कंपनीने पैसे परत केलेले नाहीत.

Maharashtra Times 22 Oct 2016, 12:08 am
मुंबई ः पर्ल्स अर्थात पीएसीएल कंपनीने देशातील एकूण सहा कोटी गुंतवणूकदारांना तब्बल ६० हजार कोटी रुपयांना गंडा घातला आहे. या सर्व गुंतवणूकदारांना पैसे परत द्या असा आदेश भांडवल बाजार नियंत्रक सेबीने देऊनही कंपनीने पैसे परत केलेले नाहीत. यामुळे येत्या २५ ऑक्टोबर रोजी पीएसीएल गुंतवणूकदार सेबीच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत. हे आंदोलन सकाळी ११ ते ४ या वेळेत होणार आहे. पैसे परत करण्यासाठी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज सेबीच्या कार्यालयात यावेळी दाखल केले जातील, असे अखिल भारतीय पर्ल्स गुंचवणूकदार संघटनेने सांगितले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dharna at sebi
पीएसीएल गुंतवणूकदारांचे धरणे



दूरसंचार कंपन्यांना दंड?

नवी दिल्ली ः कॉल जोडण्यासाठी आवश्यक असणारे ‘पॉइंट्स ऑफ इंटरकनेक्शन’ रिलायन्स जिओ कंपनीला न दिल्यामुळे एअरटेल, आयडिया आणि व्होडाफोन या कंपन्यांना प्रतिपरिमंडळ ५० कोटी रुपयांचा दंड ठोठावण्याची शिफारस भारतीय दूरसंचार नियामक मंडळाने (ट्राय) केली आहे. ‘ट्राय’ने दूरसंचार मंत्रालयाला या संदर्भात सविस्तर पत्र लिहिले आहे. एअरटेल, आयडिया आणि व्होडाफोन या कंपन्यांनी ‘रिलायन्स जिओ’ला अपेक्षित सहकार्य न केल्याने या तीन नेटवर्कवर जिओधारकांकडून येणारे कॉल ड्रॉप होत आहेत. ‘कॉल ड्रॉप’च्या मुद्द्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर दखल घेतली होती. या तीन कंपन्यांकडून ‘पॉइंट्स ऑफ इंटरकनेक्शन’ न मिळाल्यामुळे ८० टक्के कॉल ड्रॉप होत असल्याची तक्रार ‘रिलायन्स जिओ’ने ‘ट्राय’कडे केली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज