अ‍ॅपशहर

करोनाचे संकट; ई-वाहनांना लागणार ब्रेक

करोना संसर्गामुळे मंदावलेली आर्थिक उलाढाल वाहन उद्योगाच्या मुळावर आली आहे. या उद्योगाच्या वाहनविक्रीत चालू तसेच पुढील आर्थिक वर्षांतही २० टक्क्यापेक्षा अधिक घट होणार आहे, असे भाकितही इंडिया रेटिंग्जने वर्तवले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Oct 2020, 12:49 pm
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : सन २०३० पर्यंत संपूर्ण देशात ई-वाहने रस्त्यांवर चालवली जातील, हा केंद्र सरकारचा संकल्प अयशस्वी ठरण्याची शक्यता आहे. करोनाचे संकट मध्येच आल्यामुळे नियोजित गतीने ई-वाहनांचा किंवा विजेवर चालणाऱ्या वाहनांचा प्रसार देशात होऊ शकलेला नाही. त्यामुळे ई-वाहने येण्यास विलंब होणार आहे, असा अंदाज मानांकन (रेटिंग) एजन्सी इंडिया रेटिंग्जने वर्तवला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ई-वाहनांना विलंब होणार
E vehicle


दसरा ठरणार लकी ; विक्रीत मोठी वाढ होण्याची सराफांना अपेक्षा
इंडिया रेटिंग्ज अॅण्ड रिसर्चने यांसदर्भात प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात नमूद केले आहे की, ग्राहक ई-वाहने खरेदी करताना आता अधिक सावध पवित्रा घेतील. ई-वाहने ही पेट्रोल, डिझेल किंवा सीएनजी या इंधनांवरप चालणाऱ्या वाहनांपेक्षा महाग आहेत. त्यामुळे पेट्रोल व डिझेल या इंधनांची बचत करू इच्छिणारा ग्राहक त्याच्या या इंधनांवर चालणाऱ्या वाहनामध्ये बदल करून ते सीएनजीवर चालवण्यायोग्य करून घेईल. यासाठी त्याला येणारा खर्च हा विजेवर चालणारी कार खरेदी करण्यासाठी येणाऱ्या खर्चापेक्षा कितीतरी पटींनी कमी असणार आहे.

राज्यात 'इलेक्ट्रिक कार'चे हब; जगप्रसिद्ध 'टेस्ला' कंपनीला महाराष्ट्रात रेड कार्पेट!
ई-वाहने परवडणाऱ्या किंमतींत उपलब्ध नसणे आणि या वाहन क्षेत्राला प्रोत्साहन देताना सध्या संकटात असलेल्या वाहन उद्योगाला उभारी देण्यासाठी प्राधान्याने करावी लागत असलेली उपाययोजना व त्यात गुंतून पडलेले सरकार याचा फटकाही ई-वाहनांना बसणार आहे. करोना संसर्गामुळे मंदावलेली आर्थिक उलाढाल वाहन उद्योगाच्या मुळावर आली आहे. या उद्योगाच्या वाहनविक्रीत चालू तसेच पुढील आर्थिक वर्षांतही २० टक्क्यापेक्षा अधिक घट होणार आहे, असे भाकितही इंडिया रेटिंग्जने वर्तवले आहे.

चारचाकी किंवा कार अशा प्रकारे संकटातून जात असतानाच तिचाकी किंवा रिक्षा या प्रकारच्या वाहनांची विक्रीही मोठ्या प्रणाणावर कमी झाली आहे. लॉकडाउनमुळे सार्वजनिक परिवहन सेवा बराच काळ बंद राहिल्या होत्या. त्यात आता अनलॉक सुरू झाले असले तरीही करोनाचा प्रादुर्भाव वाढता दिसल्यावर त्या भागात पुन्हा लॉकडाउन लागू केले जात आहे. त्यामुळे रिक्षांची मागणी मोठ्या प्रणावर घटली आहे.

दिवाळीपूर्वी कर्जदारांना गिफ्ट;'मोरॅटोरियम'वर केंद्र सरकार घेणार 'हा' निर्णय
फायदा कुणाला?
सद्यस्थितीचा फायदा दुचाकी उद्योगाला बऱ्यापैकी होत आहे. ग्रामीण भागात दुचाकींना वाढती मागणी आहे. दुचाकी, मोटरसायकल या क्षेत्राला करोनाचा तितकासा फटका बसलेला नाही. वैयक्तिक प्रवासासाठी अत्यंत उपयुक्त असे हे वाहन असल्यामुळे दुचाकींच्या मागणीत फारशी घट दिसून आलेली नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज