नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने तीन महिन्यांची कर्जमाफी देऊनही देशाची आर्थिक स्थिती खूपच खराब आहे. केंद्र सरकारने उद्योगांना कायमच प्रोत्साहन दिले असले, तरी सद्यस्थितीत सरकारच्या मर्यादा ओळखण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.
जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. जपान आणि अमेरिकेने उद्योगांसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा केली आहे, ही बाब खरी असली तरी त्यांची अर्थव्यवस्था आपल्यापेक्षा मोठी आहे, हेही लक्षात घ्यायला हवे. करोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशव्यापी लॉकडाउनची घोषणा केली आहे. त्यातून जनतेच्या निर्माण झालेल्या समस्या लक्षात घेता रिझर्व्ह बँकेने २७ मार्चला तीन महिन्यांच्या कर्जमाफीसह अन्य उपाययोजनाही जाहीर केल्या, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले.
तेलंगणच्या उद्योगांच्या प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बातचीत करताना गडकरी यांनी अर्थ मंत्रालयालाही काही सूचना केल्या. त्यांच्या मते अर्थ मंत्रालयाने प्राप्तीकर आणि जीएसटीचे परतावे संबंधित व्यक्तीच्या खात्यामध्ये तातडीने जमा होण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. जपान आणि अमेरिकेने उद्योगांसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा केली आहे, ही बाब खरी असली तरी त्यांची अर्थव्यवस्था आपल्यापेक्षा मोठी आहे, हेही लक्षात घ्यायला हवे. करोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशव्यापी लॉकडाउनची घोषणा केली आहे. त्यातून जनतेच्या निर्माण झालेल्या समस्या लक्षात घेता रिझर्व्ह बँकेने २७ मार्चला तीन महिन्यांच्या कर्जमाफीसह अन्य उपाययोजनाही जाहीर केल्या, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले.
तेलंगणच्या उद्योगांच्या प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बातचीत करताना गडकरी यांनी अर्थ मंत्रालयालाही काही सूचना केल्या. त्यांच्या मते अर्थ मंत्रालयाने प्राप्तीकर आणि जीएसटीचे परतावे संबंधित व्यक्तीच्या खात्यामध्ये तातडीने जमा होण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.