नवी दिल्ली ः देशाच्या अर्थव्यवस्थेचा गाडा रुळांवर आणण्यासाठी अर्थसाह्य देण्याचे सूतोवाच सरकारने केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र थेट आर्थिक मदत न करता देशातील नागरिकाच्या अर्थात ग्राहकाच्या हातात पैसा देऊन, अर्थव्यवस्थेत खेळता पैसा वाढवून हे आर्थिक पॅकेज अप्रत्यक्षरीत्या देण्याचे सरकारने ठरवले आहे.
सध्याच्या सणासुदीच्या काळात ग्राहकाच्या हाती पैसा खेळवल्यास त्यामुळे बाजारात वस्तूंची मागणी वाढेल. यामुळे बाजारात पैशाचा ओघ सुरू राहील, त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. याशिवाय लघु व मध्यम उद्योगांना स्वस्त दरात कर्जे देणे, निर्गुंतवणूक करणे यासारखे उपायही सरकारकडून योजण्यात येणार आहेत. देशांतर्गत गुंतवणूक वाढावी, ग्रामीण भागात पायाभूत सुविधांचा विकास व्हावा, परवडणाऱ्या घरांच्या बांधकामाला गती यावी यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.
अर्थसाह्य आवश्यक आहे अशा अर्थव्यवस्थेतील दुबळ्या घटकांचा आढावा घेण्याची जबाबदारी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांच्यावर टाकण्यात आली आहे.
भांडवल पर्याप्तता किंवा लिक्विडीटी ही अर्थव्यवस्थेपुढील मुख्य समस्या आहे. त्यामुळेच हा ताण कमी करून ग्राहकाच्या हाती पैसा देणे आणि त्याद्वारे त्याची क्रयशक्ती वाढवणे ही काळाची गरज असल्याचे धोरणकर्त्यांचे म्हणणे आहे.
सध्याच्या सणासुदीच्या काळात ग्राहकाच्या हाती पैसा खेळवल्यास त्यामुळे बाजारात वस्तूंची मागणी वाढेल. यामुळे बाजारात पैशाचा ओघ सुरू राहील, त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. याशिवाय लघु व मध्यम उद्योगांना स्वस्त दरात कर्जे देणे, निर्गुंतवणूक करणे यासारखे उपायही सरकारकडून योजण्यात येणार आहेत. देशांतर्गत गुंतवणूक वाढावी, ग्रामीण भागात पायाभूत सुविधांचा विकास व्हावा, परवडणाऱ्या घरांच्या बांधकामाला गती यावी यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.
अर्थसाह्य आवश्यक आहे अशा अर्थव्यवस्थेतील दुबळ्या घटकांचा आढावा घेण्याची जबाबदारी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांच्यावर टाकण्यात आली आहे.
भांडवल पर्याप्तता किंवा लिक्विडीटी ही अर्थव्यवस्थेपुढील मुख्य समस्या आहे. त्यामुळेच हा ताण कमी करून ग्राहकाच्या हाती पैसा देणे आणि त्याद्वारे त्याची क्रयशक्ती वाढवणे ही काळाची गरज असल्याचे धोरणकर्त्यांचे म्हणणे आहे.