वृत्तसंस्था, म्हैसूर
कोणत्याही निवणुकीमध्ये मतदानावेळी मतदाराच्या बोटाला लावण्यात येणारी निळी शाई हा एक महत्त्वाचा घटक आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी २६ लाख निळ्या शाईच्या बाटल्यांची मागणी नोंदवली आहे. अंदाजे ९० कोटी मतदारांसाठी वापरण्यात येणाऱ्या या शाईची किंमत ३३ कोटी रुपयांच्या आसपास आहे. लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा ११ एप्रिलला पार पडणार असून, सात टप्पे १९ मे रोजी पूर्ण होणार आहेत. २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
आजवरच्या शाईखरेदीवर नजर टाकली असता, यंदा मोजावी लागणारी किंमत २००९च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत तिप्पट आहे. २००९मध्ये निळ्या शाईसाठी आयोगाली १२ कोटी रुपये खर्च आला होता. २०१४ च्या तुलनेत यंदा पक्क्या निळ्या शाईच्या साडेचार लाख अतिरिक्त बाटल्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे. शाईची प्रत्येक बाटली १० मिलीलिटरची असून, एक बाटलीच्या मदतीने अंदाजे ३५० मतदारांना शाई लावली जाते. म्हैसूर पेंट आणि वॉर्निशपासून तयार करण्यात आलेल्या शाईचा वापर पहिल्यांदा १९६२मध्ये करण्यात आला. १९६२मध्ये ३.७४ लाख शाईच्या बाटल्यांसाठी तीन लाख रुपयांचा खर्च आला होता. देशातील निवडणुकांसाठी वापरण्यात येणाऱ्या शाईचा वापर ३० देशांमध्येही करण्यात येतो.
'यूपी'त सर्वाधिक वापर
आश्चर्याची बाब म्हणजे २००४पर्यंत मतदानाचा अधिकार बजावलेल्यांना शाईचा केवळ एक ठिपका लावला जात असे. मात्र, २००६पासून निवडणूक आयोगाने शाईच्या ठिपक्याऐवजी अख्खी रेघ ओढण्याचे बजावले. त्यामुळे शाईचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला. प्रत्येक मतदान केंद्रावर दोन बाटल्या उपलब्ध करून दिल्या जातात. शाईच्या सर्वाधिक बाटल्यांचा वापर अर्थातच उत्तर प्रदेशमध्ये होत असल्याचे आढळून आले आहे. राज्यात अंदाजे तीन लाख बाटल्यांचा वापर होत असल्याचे आढळून आले आहे. सर्वांत कमी म्हणजेच २०० बाटल्यांचा वापर लक्षद्वीपमध्ये होतो.
कोणत्याही निवणुकीमध्ये मतदानावेळी मतदाराच्या बोटाला लावण्यात येणारी निळी शाई हा एक महत्त्वाचा घटक आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी २६ लाख निळ्या शाईच्या बाटल्यांची मागणी नोंदवली आहे. अंदाजे ९० कोटी मतदारांसाठी वापरण्यात येणाऱ्या या शाईची किंमत ३३ कोटी रुपयांच्या आसपास आहे. लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा ११ एप्रिलला पार पडणार असून, सात टप्पे १९ मे रोजी पूर्ण होणार आहेत. २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
आजवरच्या शाईखरेदीवर नजर टाकली असता, यंदा मोजावी लागणारी किंमत २००९च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत तिप्पट आहे. २००९मध्ये निळ्या शाईसाठी आयोगाली १२ कोटी रुपये खर्च आला होता. २०१४ च्या तुलनेत यंदा पक्क्या निळ्या शाईच्या साडेचार लाख अतिरिक्त बाटल्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे. शाईची प्रत्येक बाटली १० मिलीलिटरची असून, एक बाटलीच्या मदतीने अंदाजे ३५० मतदारांना शाई लावली जाते. म्हैसूर पेंट आणि वॉर्निशपासून तयार करण्यात आलेल्या शाईचा वापर पहिल्यांदा १९६२मध्ये करण्यात आला. १९६२मध्ये ३.७४ लाख शाईच्या बाटल्यांसाठी तीन लाख रुपयांचा खर्च आला होता. देशातील निवडणुकांसाठी वापरण्यात येणाऱ्या शाईचा वापर ३० देशांमध्येही करण्यात येतो.
'यूपी'त सर्वाधिक वापर
आश्चर्याची बाब म्हणजे २००४पर्यंत मतदानाचा अधिकार बजावलेल्यांना शाईचा केवळ एक ठिपका लावला जात असे. मात्र, २००६पासून निवडणूक आयोगाने शाईच्या ठिपक्याऐवजी अख्खी रेघ ओढण्याचे बजावले. त्यामुळे शाईचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला. प्रत्येक मतदान केंद्रावर दोन बाटल्या उपलब्ध करून दिल्या जातात. शाईच्या सर्वाधिक बाटल्यांचा वापर अर्थातच उत्तर प्रदेशमध्ये होत असल्याचे आढळून आले आहे. राज्यात अंदाजे तीन लाख बाटल्यांचा वापर होत असल्याचे आढळून आले आहे. सर्वांत कमी म्हणजेच २०० बाटल्यांचा वापर लक्षद्वीपमध्ये होतो.