मुंबई ः कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेतर्फे (ईपीएफओ) प्रत्येक आस्थापनाकडून त्याच्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोंदणी करून घेण्यासाठी मोहीम राबवली जात असून ही मोहीम ३१ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. याअंतर्गत आस्थापने, कंपन्या किंवा मालक यांनी स्वतःहून किती कर्मचारी काम करतात याची माहिती द्यायची आहे.
अशी प्रामाणिकपणे माहिती दिल्यास संबंधित कंपनीने कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीसाठी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनीचा वाटा इतके दिवस जमा केलेला नसल्यास त्याबाबत कोणतीही कारवाई केली जाणार नाही. माहिती दिलेल्या कर्मचाऱ्याला यासाठी नुकसानभरपाई दरवर्षी एक रुपया याप्रमाणे द्यायची आहे. कंपनी किंवा मालकाकडून नोंदणी प्रक्रियेसाठी प्रशासकीय शुल्क घेतले जाणार नाही. ईपीएफओ कलम ७ए अंतर्गत अशा नोंदणीसाठी कंपनीची कोणतीही चौकशी केली जाणार नाही, असे ईपीएफओने स्पष्ट केले आहे.
याशिवाय कर्मचारी व कंपन्या यांना ईपीएफविषयक सेवा देण्यासाठी ईपीएफओने विशेष पोर्टल सुरू केले आहे. कंपन्यांना आपले प्रश्न employerfeedback@epfidia.gov.in या संकेतस्थळावर मांडता येतील. तर कर्मचारी आपले प्रश्न employeefeedback@epfidia.gov.in येथे मांडू शकतील, असेही संघटनेने कळवले आहे.
अशी प्रामाणिकपणे माहिती दिल्यास संबंधित कंपनीने कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीसाठी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनीचा वाटा इतके दिवस जमा केलेला नसल्यास त्याबाबत कोणतीही कारवाई केली जाणार नाही. माहिती दिलेल्या कर्मचाऱ्याला यासाठी नुकसानभरपाई दरवर्षी एक रुपया याप्रमाणे द्यायची आहे. कंपनी किंवा मालकाकडून नोंदणी प्रक्रियेसाठी प्रशासकीय शुल्क घेतले जाणार नाही. ईपीएफओ कलम ७ए अंतर्गत अशा नोंदणीसाठी कंपनीची कोणतीही चौकशी केली जाणार नाही, असे ईपीएफओने स्पष्ट केले आहे.
याशिवाय कर्मचारी व कंपन्या यांना ईपीएफविषयक सेवा देण्यासाठी ईपीएफओने विशेष पोर्टल सुरू केले आहे. कंपन्यांना आपले प्रश्न employerfeedback@epfidia.gov.in या संकेतस्थळावर मांडता येतील. तर कर्मचारी आपले प्रश्न employeefeedback@epfidia.gov.in येथे मांडू शकतील, असेही संघटनेने कळवले आहे.