अ‍ॅपशहर

कर्मचारी नोंदणी ३१ मार्चपर्यंत

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेतर्फे (ईपीएफओ) प्रत्येक आस्थापनाकडून त्याच्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोंदणी करून घेण्यासाठी मोहीम राबवली जात असून ही मोहीम ३१ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.

Maharashtra Times 17 Feb 2017, 2:06 am
मुंबई ः कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेतर्फे (ईपीएफओ) प्रत्येक आस्थापनाकडून त्याच्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोंदणी करून घेण्यासाठी मोहीम राबवली जात असून ही मोहीम ३१ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. याअंतर्गत आस्थापने, कंपन्या किंवा मालक यांनी स्वतःहून किती कर्मचारी काम करतात याची माहिती द्यायची आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम epfo
कर्मचारी नोंदणी ३१ मार्चपर्यंत


अशी प्रामाणिकपणे माहिती दिल्यास संबंधित कंपनीने कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीसाठी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनीचा वाटा इतके दिवस जमा केलेला नसल्यास त्याबाबत कोणतीही कारवाई केली जाणार नाही. माहिती दिलेल्या कर्मचाऱ्याला यासाठी नुकसानभरपाई दरवर्षी एक रुपया याप्रमाणे द्यायची आहे. कंपनी किंवा मालकाकडून नोंदणी प्रक्रियेसाठी प्रशासकीय शुल्क घेतले जाणार नाही. ईपीएफओ कलम ७ए अंतर्गत अशा नोंदणीसाठी कंपनीची कोणतीही चौकशी केली जाणार नाही, असे ईपीएफओने स्पष्ट केले आहे.

याशिवाय कर्मचारी व कंपन्या यांना ईपीएफविषयक सेवा देण्यासाठी ईपीएफओने विशेष पोर्टल सुरू केले आहे. कंपन्यांना आपले प्रश्न employerfeedback@epfidia.gov.in या संकेतस्थळावर मांडता येतील. तर कर्मचारी आपले प्रश्न employeefeedback@epfidia.gov.in येथे मांडू शकतील, असेही संघटनेने कळवले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज