वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भाडंवल बाजार गेले काही दिवस अत्यंत सकारात्मक वाटचाल करत असल्यामुळे इक्विटी म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक चांगला परतावा देत असल्याचे निष्पन्न झाले आहे. परिणामी, या फंडांमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. एकट्या मे महिन्यात इक्विटी फंडांमध्ये १० हजार ७९० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून, ती गेल्या दोन वर्षांतील उच्चांकी मासिक गुंतवणूक ठरली आहे. म्युच्युअल फंड कंपन्यांनी ग्राहकांमध्ये केलेली जागृती आणि गुंतवणूकदारांचा शेअर बाजारावर वाढलेला विश्वास ही गुंतवणूक वाढण्यामागील प्रमुख कारणे ठरली आहेत.
सलग चौदाव्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंड योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली आहे. यापूर्वी मार्च २०१६मध्ये या योजनांतून एक हजार ३७० कोटी रुपये काढून घेण्यात आले होते. इक्विटी फंडांमधील गुंतवणुकीत सातत्याने वाढ होत असल्याने एप्रिलच्या तुलनेत म्युच्युअल फंडांच्या संपत्तीमध्ये २.६ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. ‘गुंतवणूकदार जागृतीसाठी केलेले प्रयत्न आणि कागदविरहित गुंतवणूक करण्याची सोय उपलब्ध केल्याने ग्राहकांचा म्युच्युअल फंडांवरील विश्वास दिवसेंदिवस अधिकच दृढ होत आहे, ’ अशी माहिती बजाज कॅपिटलचे सीईओ राहुल पारिख यांनी दिली.
म्युच्युअल फंडांमध्ये विशेषतः इक्विटी योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. त्यातच पुन्हा गुंतवणूकदार सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) आणि एकरकमी भरणा या माध्यमातून दीर्घकाळ गुंतवणूक करण्यावर भर देत आहे. एसआयपीच्या पर्यायामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारालाही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे सोपे झाले आहे. म्युच्युअल फंडांत प्रामुख्याने आठवड्याला, दरमहा आणि तिमाही गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढत आहे, असेही पारिख यांनी नमूद केले.
‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’च्या (अॅम्फी) आकडेवारीनुसार ‘ईएलएसएस’चा अंतर्भाव असणाऱ्या इक्विटी फंड योजनांमध्ये मे आणि एप्रिल महिन्यात अनुक्रमे १० हजार ७९० कोटी रुपये आणि नऊ हजार ४२९ कोटी रुपयांची भर पडली. जून २०१५नंतर इक्विटी फंडांमध्ये प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली आहे. जून २०१५मध्ये इक्विटी फंडांमध्ये १२ हजार २७३ कोटी रुपये जमा झाले होते. मे २०१६मध्ये चार हजार ७२१ कोटी रुपये जमा झाले.
गुंतवणूक ५.८३ लाख कोटींवर
सातत्याने होणाऱ्या गुंतवणुकीमुळे मत्ता व्यवस्थापन कंपन्यांमध्ये मे अखेरपर्यंत जमा झालेली गुंतवणूक ५.८३ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. एप्रिल अखेरीस ही गुंतवणूक ५.६९ लाख कोटी रुपये होती.
भाडंवल बाजार गेले काही दिवस अत्यंत सकारात्मक वाटचाल करत असल्यामुळे इक्विटी म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक चांगला परतावा देत असल्याचे निष्पन्न झाले आहे. परिणामी, या फंडांमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. एकट्या मे महिन्यात इक्विटी फंडांमध्ये १० हजार ७९० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून, ती गेल्या दोन वर्षांतील उच्चांकी मासिक गुंतवणूक ठरली आहे. म्युच्युअल फंड कंपन्यांनी ग्राहकांमध्ये केलेली जागृती आणि गुंतवणूकदारांचा शेअर बाजारावर वाढलेला विश्वास ही गुंतवणूक वाढण्यामागील प्रमुख कारणे ठरली आहेत.
सलग चौदाव्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंड योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली आहे. यापूर्वी मार्च २०१६मध्ये या योजनांतून एक हजार ३७० कोटी रुपये काढून घेण्यात आले होते. इक्विटी फंडांमधील गुंतवणुकीत सातत्याने वाढ होत असल्याने एप्रिलच्या तुलनेत म्युच्युअल फंडांच्या संपत्तीमध्ये २.६ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. ‘गुंतवणूकदार जागृतीसाठी केलेले प्रयत्न आणि कागदविरहित गुंतवणूक करण्याची सोय उपलब्ध केल्याने ग्राहकांचा म्युच्युअल फंडांवरील विश्वास दिवसेंदिवस अधिकच दृढ होत आहे, ’ अशी माहिती बजाज कॅपिटलचे सीईओ राहुल पारिख यांनी दिली.
म्युच्युअल फंडांमध्ये विशेषतः इक्विटी योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. त्यातच पुन्हा गुंतवणूकदार सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) आणि एकरकमी भरणा या माध्यमातून दीर्घकाळ गुंतवणूक करण्यावर भर देत आहे. एसआयपीच्या पर्यायामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारालाही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे सोपे झाले आहे. म्युच्युअल फंडांत प्रामुख्याने आठवड्याला, दरमहा आणि तिमाही गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढत आहे, असेही पारिख यांनी नमूद केले.
‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’च्या (अॅम्फी) आकडेवारीनुसार ‘ईएलएसएस’चा अंतर्भाव असणाऱ्या इक्विटी फंड योजनांमध्ये मे आणि एप्रिल महिन्यात अनुक्रमे १० हजार ७९० कोटी रुपये आणि नऊ हजार ४२९ कोटी रुपयांची भर पडली. जून २०१५नंतर इक्विटी फंडांमध्ये प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली आहे. जून २०१५मध्ये इक्विटी फंडांमध्ये १२ हजार २७३ कोटी रुपये जमा झाले होते. मे २०१६मध्ये चार हजार ७२१ कोटी रुपये जमा झाले.
गुंतवणूक ५.८३ लाख कोटींवर
सातत्याने होणाऱ्या गुंतवणुकीमुळे मत्ता व्यवस्थापन कंपन्यांमध्ये मे अखेरपर्यंत जमा झालेली गुंतवणूक ५.८३ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. एप्रिल अखेरीस ही गुंतवणूक ५.६९ लाख कोटी रुपये होती.