वृत्तसंस्था, नवी दिल्ली मागील दोन वर्षे सातत्याने दुष्काळ पडल्यामुळे यंदा मान्सून चांगला झाला तरीही शेतीत सुधारणा होणे कठीण असल्याचे इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्च या संस्थेचे म्हणणे आहे. कृषी क्षेत्रात सुधारणा होण्यासाठी सातत्याने मान्सून चांगला होण्याची आवश्यकता असल्याचे इंडिया रेटिंग्जने आपल्या अहवालात नमूद केले आहे.
शेतीत सुधारणा होण्यासाठी चांगल्या पावसाबरोबरच उत्पादनात सुधारणा, प्रति एकर वाढते उत्पादन आणि योग्य किमान आधारभूत किंमत या सर्वांची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय अर्थसंकल्पात घोषित केलेल्या कृषीविषयक योजना राबवल्या जाण्याचीही गरज आहे. कृषी क्षेत्राची वाढ गेल्या पाच वर्षांपासून कूर्मगतीने होत आहे. त्याचप्रमाणे उत्पादन झालेल्या कृषीमालाला योग्य भावही गेली काही वर्षे मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच एकदाच आलेला चांगला मान्सून कृषी क्षेत्रासाठी पुरेसा नाही, असे इंडिया रेटिंग्जचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांची पिककर्जे थकित असण्याबरोबरच बऱ्याच ठिकाणी ट्रॅक्टरसाठी घेतलेले कर्जही थकित आहे. जलसिंचनांतर्गत येणाऱ्या शेतजमिनीवर चांगल्या प्रकारे उत्पादन झालेले नाही. अवेल पावसाने उभी पिके गेल्या वर्षी धोक्यात आली होती. त्यामुळे गेल्या पाच वर्षांचे साचलेले नुकसान मोठे आहे. यातून पूर्णपणे बाहेर पडायचे झाल्यास यापुढील दोन मान्सून चांगले होमे आवश्यक आहे, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
शेतीत सुधारणा होण्यासाठी चांगल्या पावसाबरोबरच उत्पादनात सुधारणा, प्रति एकर वाढते उत्पादन आणि योग्य किमान आधारभूत किंमत या सर्वांची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय अर्थसंकल्पात घोषित केलेल्या कृषीविषयक योजना राबवल्या जाण्याचीही गरज आहे. कृषी क्षेत्राची वाढ गेल्या पाच वर्षांपासून कूर्मगतीने होत आहे. त्याचप्रमाणे उत्पादन झालेल्या कृषीमालाला योग्य भावही गेली काही वर्षे मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच एकदाच आलेला चांगला मान्सून कृषी क्षेत्रासाठी पुरेसा नाही, असे इंडिया रेटिंग्जचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांची पिककर्जे थकित असण्याबरोबरच बऱ्याच ठिकाणी ट्रॅक्टरसाठी घेतलेले कर्जही थकित आहे. जलसिंचनांतर्गत येणाऱ्या शेतजमिनीवर चांगल्या प्रकारे उत्पादन झालेले नाही. अवेल पावसाने उभी पिके गेल्या वर्षी धोक्यात आली होती. त्यामुळे गेल्या पाच वर्षांचे साचलेले नुकसान मोठे आहे. यातून पूर्णपणे बाहेर पडायचे झाल्यास यापुढील दोन मान्सून चांगले होमे आवश्यक आहे, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.