नवी दिल्ली : वाढत्या सायबर गुन्ह्यांबाबत चिंतेचे वातावरण असताना या गुन्ह्यांची तीव्रता बुधवारी लोकसभेत अधोरेखित झाली. चालू वर्षात आतापर्यंत ३,१३,००० सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आयटी राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिली. यामध्ये वेबसाइट हॅकिंग, फिशिंग आदीचे प्रमाण सर्वाधिक आहे. २०१७च्या तुलनेत या गुन्ह्यांचे प्रमाण सहापटीने वाढले असल्याचेही या आकडेवारीतून स्पष्ट झाले. धोत्रे म्हणाले, की या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार सर्वतोपरी उपाययोजना करत आहे. खासगी तसेच, आस्थापनांतील सर्व्हर आदी यंत्रणांची सुरक्षा सतत चोख असणे आवश्यक आहे.
सायबर गुन्ह्यांत कमालीची वाढ
वाढत्या सायबर गुन्ह्यांबाबत चिंतेचे वातावरण असताना या गुन्ह्यांची तीव्रता बुधवारी लोकसभेत अधोरेखित झाली...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Nov 2019, 4:00 am