अ‍ॅपशहर

८-१० बँकाच राहणार

सरकारी क्षेत्रातील २७ बँकांचे एकत्रिकरण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून या विलिनीकरणानंतर देशात ८ ते १० सरकारी बँका राहतील, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी स्पष्ट केले.

Maharashtra Times 28 May 2016, 3:00 am
नवी दिल्ली: सरकारी क्षेत्रातील २७ बँकांचे एकत्रिकरण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून या विलिनीकरणानंतर देशात ८ ते १० सरकारी बँका राहतील, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी स्पष्ट केले. बंगळुरू येथे एका परिषदेत ते बोलत होते. या ८ ते १० बँकांपैकी काही बँका जागतिक स्तरावरील मोठ्या बँका म्हणून कार्यरत होतील, असा विश्वासही सिन्हा यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम fast news
८-१० बँकाच राहणार


करविषयक परिषद

मुंबई: आंतरराष्ट्रीय कर व ट्रान्स्फर प्रायसिंग या विषयांवर येथे अखिल भारतीय स्तरावरील आयकर अधिकारी परिषद नुकतीच झाली. आयकर विभागाची कार्यक्षमता, कारभारातील पारदर्शकता आणि कर प्रशासनातील स्थिरता या विषयांवर परिषदेत चर्चा झाली. आंतरराष्ट्रीय करप्रणाली आणि ट्रान्स्फर प्रायसिंग प्रशासन यावरही ऊहापोह झाला. परिषदेला आयकराचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज