अ‍ॅपशहर

‘गोल्ड बाँड’चा पाचवा टप्पा १ सप्टेंबरपासून

गोल्ड बाँडच्या माध्यमातून केंद्र सरकार गुंतवणूकदारांना धातूच्या खरेदीपासून लांब ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा पाचवा टप्पा एक सप्टेंबरपासून सुरू होत आहे.

Maharashtra Times 31 Aug 2016, 3:00 am
नवी दिल्ली : गोल्ड बाँडच्या माध्यमातून केंद्र सरकार गुंतवणूकदारांना धातूच्या खरेदीपासून लांब ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा पाचवा टप्पा एक सप्टेंबरपासून सुरू होत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम fifth trench of gold bond scheme
‘गोल्ड बाँड’चा पाचवा टप्पा १ सप्टेंबरपासून


केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार बाँडसाठी १ सप्टेंबर २०१६ ते ९ सप्टेंबर २०१६ या कालावधीत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. २३ सप्टेंबर रोजी बाँड जारी करण्यात येणार आहेत. या बाँडची विक्री सार्वजनिक बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, टपाल कार्यालये, राष्ट्रीय शेअर बाजार (नवी दिल्ली) आणि मुंबई शेअर बाजार यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

गोल्ड बाँड योजनेला अधिक आकर्षक बनविण्यासाठी केंद्र सरकारने चौथ्या टप्प्यात बऱ्याच उपाययोजना केल्या. त्याअंतर्गत बाँडमध्ये गुंतवणुकीची किमान मर्यादा दोन ग्रॅमवरून एक ग्रॅमवर आणण्यात आली. कोणीही व्यक्ती अथवा संस्था एका आर्थिक वर्षात ५०० ग्रॅमपेक्षा अधिक गुंतवणूक करू शकणार नाही. गेल्या वर्षी ३० ऑक्टोबर रोजी गोल्ड बाँड योजना जाहीर करण्यात आली होती. सुरुवातीच्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदाराला २.७५ टक्के दराने वार्षिक व्याज मिळेल. दर सहा महिन्यांनी व्याज देण्यात येणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज