अ‍ॅपशहर

अर्थमंत्री निर्मला सीतारामनची बँकांवर कडक शब्दात टीका, म्हणाल्या - “भाषा शिकण्यात...”

Nirmala Sitharaman on Banks: केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांना स्थानिक भाषा बोलणारे कर्मचारी नियुक्त करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी एका घटनेकडे लक्ष वेधले, जेव्हा बँकेच्या अधिकाऱ्याने एका ग्राहकाला त्याला हिंदी समजत नाही असे सांगितले.

Authored byप्रियांका वर्तक | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Sep 2022, 11:40 am
मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांचे फ्रंट-डेस्कचे कर्मचारी स्थानिक भाषा बोलतात हे बँकांना सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. तसेच देशभक्तीचे आवाहन करत नाही आणि ग्राहकांना हिंदी येत नसल्याबद्दल प्रश्न विचारतात. "आपल्याकडे स्थानिक भाषा बोलत नाही असे कर्मचारी असू शकत नाहीत का? आणि जे नागरिकांकडून मागणी करतात की त्यांनी एखादी विशिष्ट भाषा बोलली पाहिजे आणि म्हणतात की जोवर ते तसे करत नाहीत ते भारतीय नाहीत," सीतारामन म्हणाल्या. मुंबईत इंडियन बँक्स असोसिएशनच्या ७५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Nirmala Sitharaman on Banking


देशात आर्थिक मंदीची शक्यता किती टक्के?; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्टच सांगितले
त्यांनी बँकांना शाखा स्तरावर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचा आढावा घेण्यास सांगितले. सीतारामन यांनी आयबीएला सांगितले की जर बँकांना कर्मचार्‍यांची जुळणी करण्यात समस्या येत असतील आणि असे कर्मचारी असतील, जे स्थानिक भाषेत संवाद साधू शकत नाहीत, तर त्यांना ग्राहकासमोरील नोकऱ्यांपासून दूर ठेवले पाहिजे. अर्थमंत्र्यांनी हे विधान अशा वेळी केले, जेव्हा सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांनी दक्षिण भारतातील शाखांमध्ये ग्राहकांना हिंदीत बोलण्यास सांगण्यात आल्याच्या घटनांनी सोशल मीडियावर संताप निर्माण केला आहे.

महागाईने सर्वांना त्रास; पण अर्थमंत्री म्हणाल्या भारतात मंदीची लाट नाही
बँकर्सच्या म्हणण्यानुसार भरतीसाठी उत्तरेकडे अधिक कल आहे कारण दक्षिणेतील पदवीधर तरुण आयटी नोकऱ्यांना प्राधान्य देतात, ज्यात बदल्या होत नाहीत. “भरती करणार्‍यांना आता लोकांची भरती करण्यासाठी अधिक समजूतदार मार्ग अवलंबावे लागतील. तुम्हाला एखाद्या विशिष्ट प्रदेशात 'x' संख्येची गरज असल्यास, तुम्ही x आणि भाषा बोलू शकतील अशा आणखी काही लोकांची भरती केल्याची खात्री करा," अर्थमंत्र्यांनी सांगितले. त्यांनी बँक कर्मचाऱ्यांना सांगितले की सर्वसमावेशकता क्रेडिटने संपत नाही आणि ती ऑपरेशन्सपर्यंत वाढवण्याची गरज आहे.

भारताचा GDP वाढीचा दर घसरणार की वाढणार, अर्थमंत्री सीतारमणांनी दिले स्पष्ट उत्तर
“भाषा शिकण्यात काय अडचण आहे? मी दक्षिणेकडची आहे. माझं बोलणं कमी असलं तरी मी थोडंसं हिंदी शिकण्याचा प्रयत्न करते. जोपर्यंत माझी कर्मभूमी येथे आहे, तोपर्यंत मला भाषा शिकायची आहे. मला समजू शकत नाही की IBA एखाद्या क्षेत्रात पोस्ट केलेल्या आणि त्या भागाची भाषा बोलू न शकणाऱ्या अधिकाऱ्यांना सहन कसे करते,” निर्मला सीतारामन यांनी म्हटले.

“मी कठोर शब्दात बोलते कारण तेच बँकिंगचे स्वरूप आहे. तुम्ही लोकांशी वागत आहात आणि तुम्ही त्यांचा व त्यांच्या भाषेचा आदर करू शकता,” अर्थमंत्री म्हणाले. पूर्वीच्या काळात बँका अडचणीतून बाहेर आल्या आणि त्यांच्या सर्व ताकदीच्या जोरावर त्या सक्षम झाल्याबद्दल अर्थमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.
लेखकाबद्दल
प्रियांका वर्तक
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर या पदावर मी कार्यरत आहे. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात तब्बल ७ वर्षाचा अनुभव आहे. क्रीडा पत्रकारितेवर विशेष प्रभूत्व असून व्यापार क्षेत्रातील बातम्यांच्या लिखाणाची आवड. भटकंतीसह बॅडमिंटन, क्रिकेट या खेळाची विशेष आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख