मुंबई : देशातील शेअर बाजारांत मागील १० दिवसांत विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी १२ हजार १९० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या विदेशी गुंकवणूकदारांनी समभागविक्रीचा सपाटा लावला होता. त्या तुलनेत गेल्या १० दिवसांतील गुंतवणूक महत्त्वाची मानली जात आहे. या प्रकारे मोठ्या प्रमाणावर विदेशी गुंतवणूक आली असता, देशातील गुंतवणूकदारांनी मात्र याच काळात २,६७७ कोटी रुपयांचे समभाग विकले आहेत.
वाचा - शेअर बाजारात पैसे न गुंतवताही मिळवा भरगोस उत्त्पन्न, जाणून घ्या कोणते आहे रिस्क फ्री मार्ग
विदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढू लागल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी वधारू लागले आहेत. त्याचप्रमाणे भारतीय रुपयामध्ये कमी प्रमाणात चढउतार दिसून येत आहेत. जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक धोरणकर्ते डॉ. व्ही. के. विजयकुमार यांनी सांगितले की, विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून ऑक्टोबर २०२१ पासून जून २०२२पर्यंत सातत्याने समभागांची विक्री करण्यात येत होती. हेच विदेशी गुंतवणूकदार जुलै महिन्यात समभागांची खरेदी करू लागले. ऑगस्ट महिन्यातही या गुंतवणूकदारांकडून समभागांची खरेदी कायम राहिली.
वाचा - अनिल अंबानींच्या ५०० कोटींचा भूखंड काय होणार; मुंबईत बांधायचं होतं स्वप्नातील घर
विदेशी गुंतवणूकदारांचा देशातील शेअर बाजारावरील हा वाढता विश्वास दोन्ही शेअर बाजारांना बळ देऊन गेला आहे. मागील नऊ महिन्यांनंतर विदेशी गुंतवणुकीचा ओघ सुरू झाला आहे. जुलै महिन्यात या गुंतवणूकदारांनी सुमारे ४,९८० कोटींंच्या समभागांची खरेदी केली आहे. मात्र त्याआधी ५०,२०३ कोटींचे समभाग विकले होते.
वाचा - शेअर बाजारात पैसे न गुंतवताही मिळवा भरगोस उत्त्पन्न, जाणून घ्या कोणते आहे रिस्क फ्री मार्ग
विदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढू लागल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी वधारू लागले आहेत. त्याचप्रमाणे भारतीय रुपयामध्ये कमी प्रमाणात चढउतार दिसून येत आहेत. जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक धोरणकर्ते डॉ. व्ही. के. विजयकुमार यांनी सांगितले की, विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून ऑक्टोबर २०२१ पासून जून २०२२पर्यंत सातत्याने समभागांची विक्री करण्यात येत होती. हेच विदेशी गुंतवणूकदार जुलै महिन्यात समभागांची खरेदी करू लागले. ऑगस्ट महिन्यातही या गुंतवणूकदारांकडून समभागांची खरेदी कायम राहिली.
वाचा - अनिल अंबानींच्या ५०० कोटींचा भूखंड काय होणार; मुंबईत बांधायचं होतं स्वप्नातील घर
विदेशी गुंतवणूकदारांचा देशातील शेअर बाजारावरील हा वाढता विश्वास दोन्ही शेअर बाजारांना बळ देऊन गेला आहे. मागील नऊ महिन्यांनंतर विदेशी गुंतवणुकीचा ओघ सुरू झाला आहे. जुलै महिन्यात या गुंतवणूकदारांनी सुमारे ४,९८० कोटींंच्या समभागांची खरेदी केली आहे. मात्र त्याआधी ५०,२०३ कोटींचे समभाग विकले होते.