नवी दिल्ली ः चालू महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भांडवल बाजारातून तब्बल पाच हजार ५०० कोटी रुपये काढून घेतले आहेत. भौगोलिक-राजकीय अशांततेचा हा थेट परिणाम मानला जात आहे.
यापूर्वी ऑगस्ट महिन्यात याच परदेशी गुंतवणूकदारांनी १२ हजार ७७० कोटी रुपये काढून घेतले होते. गेल्या सहा महिन्यांत एकूण ६२ हजार कोटी रुपये परदेशी गुंतवणूकदारांनी काढून मायदेशी नेले आहेत. सप्टेंबर १ ते २२ या काळात या गुंतवणूकदारांनी पाच हजार ४९२ कोटी रुपये किंवा ८५५ दशलक्ष डॉलर काढून घेतले. मात्र त्याचवेळी डेट मार्केटमध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी चार हजार ४३० कोटी रुपये गुंतवले आहेत. याचा अर्थ इक्विटी मार्केटमधील हिस्सा कमी होत असून निश्चित परतावा देणाऱ्या डेट मार्केटमध्ये या गुंतवणूकदारांची रुची वाढत आहे.
इक्विटी मार्केटमध्ये सध्या परदेशी गुंतवणूकदारांची गुंतवणूक ४० हजार २५३ कोटी रुपये झाली आहे.
यापूर्वी ऑगस्ट महिन्यात याच परदेशी गुंतवणूकदारांनी १२ हजार ७७० कोटी रुपये काढून घेतले होते. गेल्या सहा महिन्यांत एकूण ६२ हजार कोटी रुपये परदेशी गुंतवणूकदारांनी काढून मायदेशी नेले आहेत. सप्टेंबर १ ते २२ या काळात या गुंतवणूकदारांनी पाच हजार ४९२ कोटी रुपये किंवा ८५५ दशलक्ष डॉलर काढून घेतले. मात्र त्याचवेळी डेट मार्केटमध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी चार हजार ४३० कोटी रुपये गुंतवले आहेत. याचा अर्थ इक्विटी मार्केटमधील हिस्सा कमी होत असून निश्चित परतावा देणाऱ्या डेट मार्केटमध्ये या गुंतवणूकदारांची रुची वाढत आहे.
इक्विटी मार्केटमध्ये सध्या परदेशी गुंतवणूकदारांची गुंतवणूक ४० हजार २५३ कोटी रुपये झाली आहे.