अ‍ॅपशहर

RBIचे नियमबदल हा रणनीतीचा भाग: मोदी

नोटाबंदीची अंमलबजावणी करताना रिझर्व्ह बँकेनं रोजच्या रोज आणलेले नवे नियम आणि त्यात वारंवार केलेल्या बदलाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार समर्थन केलं आहे. 'शत्रूशी लढताना सतत सावध आणि एक पाऊल पुढं राहावं लागतं. या रणनीतीला अनुसरूनच गेल्या ५० दिवसांत रिझर्व्ह बँकेनं काम केलं. नोटाबंदीचा उद्देश हाणून पाडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांची कोंडी करण्यासाठीच जाणीवपूर्वक नियमांत बदल केले गेले,' असं मोदी यांनी म्हटलं आहे.

Maharashtra Times 30 Dec 2016, 4:01 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम frequent rule changes done to corner the corrupt pm modi
RBIचे नियमबदल हा रणनीतीचा भाग: मोदी


नोटाबंदीची अंमलबजावणी करताना रिझर्व्ह बँकेनं रोजच्या रोज आणलेले नवे नियम आणि त्यात वारंवार केलेल्या बदलाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार समर्थन केलं आहे. 'शत्रूशी लढताना सतत सावध आणि एक पाऊल पुढं राहावं लागतं. या रणनीतीला अनुसरूनच गेल्या ५० दिवसांत रिझर्व्ह बँकेनं काम केलं. नोटाबंदीचा उद्देश हाणून पाडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांची कोंडी करण्यासाठीच जाणीवपूर्वक नियमांत बदल केले गेले,' असं मोदी यांनी म्हटलं आहे.

'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय व त्याच्या अंमलबजावणीबाबत भाष्य केलं. 'नीती आणि रणनीतीमधील फरक आपण समजून घेतला पाहिजे. या दोन्ही गोष्टींना एकाच तराजूत तोलता येणार नाही. नोटाबंदीचा आमचा निर्णय हा धोरणात्मक होता. तो नीतीचा भाग होता. हा निर्णय अत्यंत अचूक व स्पष्ट होता. तो राबवण्याची आमची रणनीती मात्र वेगळी होती. 'तू डाल-डाल मै पात-पात' (तुम्ही फांदीवर तर आम्ही पानांवर) या जुन्या म्हणीप्रमाणं शत्रूपेक्षा एक पाऊल पुढं असणारी ही रणनीती होती,' असं मोदी म्हणाले.

'नोटाबंदीचा आमचा निर्णय इतका मोठा होता की भल्या-भल्या अर्थतज्ज्ञांचे अंदाज चुकले. देशातील सव्वाशे कोटी जनतेनं मात्र या निर्णयाला पाठिंबा दिला. नोटाबंदीचा निर्णय तात्कालिक फायद्यासाठी घेण्यात आलेला नाही. यामागं दीर्घकालीन विचार आहे. हे लोकांनी समजून घेतलं आणि अडचणी सहन करूनही ते आमच्या मागे उभे राहिले,' असं मोदी म्हणाले.

असं होईलच कसं?

नोटाबंदीवर टीका करणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचाही मोदी यांनी समाचार घेतला. 'काँग्रेसच्या नेतृत्वानं नोटाबंदीवर आततायीपणं टीका करून स्वत:चं हसं करून घेतलं. एकीकडं, मी हा निर्णय राजकीय फायद्यासाठी घेतल्याचा काँग्रेसचा आरोप होता. दुसरीकडं, या निर्णयामुळं लोकांचे हाल होत आहेत, अशी ओरड सुरू होती. लोकांचे हाल करून राजकीय फायदा कसा मिळेल? दोन्ही एकाच वेळी कसं होऊ शकतं,' असा सवाल मोदी यांनी केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज