अ‍ॅपशहर

गरिबांना दिलासा! पुढचे तीन महिने ५ किलो गहू, तांदूळ मोफत

करोनाच्या विषाणूच्या फैलावामुळं आर्थिक फटका बसलेल्या देशातील गरिबांना केंद्र सरकारनं आज मोठा दिलासा देताना १ लाख ७० हजार कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. त्यानुसार, दारिद्र रेषेखालील कुटुंबांना पुढील तीन महिने ५ किलो गहू व तांदूळ मोफत मिळणार आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Mar 2020, 2:38 pm
नवी दिल्ली: करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन आहे. गरिब जनतेची गैरसोय टाळण्यासाठी आता सरकारनं पावलं उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आर्थिक पॅकेजची घोषणा केली. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत गरिबाला पुढील तीन महिने प्रत्येकी पाच किलो तांदूळ किंवा गहू मोफत दिले जाणार आहे. त्यासोबतच एक किलो डाळ दिली जाणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Sitaraman


करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्याचा मोठा फटका गरीब, मजूर आणि इतर घटकांना बसणार आहे. मात्र, केंद्र सरकारनं या वर्गाला मोठा दिलासा दिला आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत लाभार्थींना आधीच पाच किलो तांदूळ किंवा गहू दिले जात आहेत. त्यात आता पुढील तीन महिन्यांसाठी मोफत गहू किंवा तांदूळ मोफत दिले जाणार आहे. याशिवाय एक किलो डाळही मोफत दिली जाणार आहे. या योजनेचा ८० हजार गरिबांना लाभ मिळणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज