म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
रत्ने, हिरे व दागिने यांच्या निर्यातीसाठी सध्या योग्य काळ आहे, असे जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष प्रवीणशंकर पंड्या यांनी येथे सांगितले. रत्ने व दागिने उद्योगाचा आढावा घेताना ते पत्रकारांशी बोलत होते.
हा उद्योग मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणारा असल्याचे सांगून पंड्या म्हणाले, सरकारने सध्या आकारले जाणारे १२ टक्के सीमाशुल्क कमी केल्यास या उद्योगासाठी फायदा होईल. भारतात सीमाशुल्क अधिक असल्यामुळे अनेकजण दागदागिने दुबईतून खरेदी करतात. यामुळे देशाचे लाखो रुपयांचे परकीय चलन बुडते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलने काही उद्दिष्टे ठरवली आहेत, असेही पंड्या यांनी यावेळी सांगितले, की निर्यातीला चालना देणे, रोजगाराची निर्मिती करणे, दागिने उद्योगात मूल्यवर्धन करणे यासारखे उद्देश ठरवण्यात आले आहेत. या उद्योगात येण्यासाठी अनेक तरुण उत्सुक असून या क्षेत्रात चांगला पैसा मिळू शकतो. यासाठी जेम्स अँड ज्वेलरी उद्योगाला पूरक प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. म्हणून या विषयाचे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची तयारी कौन्सिलने सुरू केली आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने नवी मुंबईत जागू देऊ, असे आश्वासनही दिल्याचे पंड्या यांनी सांगितले.
हिऱ्यांना पैलू पाडण्याच्या व्यवसायात भारताने जगभरात नाव कमावले आहे. या हिऱ्यांची निर्यातही मोठ्या प्रमाणावर होत आहे. ही निर्यात १० टक्क्यांनी वाढल्यास एक लाख रोजगार वाढतात. आज या क्षेत्रात १२ लाख लोक काम करत आहेत. त्यामुळे हे क्षेत्र रोजगार देमारे क्षेत्र आहे. मात्र सध्या कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर उणीव आहे. जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान आज भारताकडे आहे. परंतु केवळ कुशल मनुष्यबळ नसल्यामुळे आपण मागे पडतो, अशी खंतही प्रवीणशंकर पंड्या यांनी व्यक्त केली.
रत्ने, हिरे व दागिने यांच्या निर्यातीसाठी सध्या योग्य काळ आहे, असे जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष प्रवीणशंकर पंड्या यांनी येथे सांगितले. रत्ने व दागिने उद्योगाचा आढावा घेताना ते पत्रकारांशी बोलत होते.
हा उद्योग मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणारा असल्याचे सांगून पंड्या म्हणाले, सरकारने सध्या आकारले जाणारे १२ टक्के सीमाशुल्क कमी केल्यास या उद्योगासाठी फायदा होईल. भारतात सीमाशुल्क अधिक असल्यामुळे अनेकजण दागदागिने दुबईतून खरेदी करतात. यामुळे देशाचे लाखो रुपयांचे परकीय चलन बुडते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलने काही उद्दिष्टे ठरवली आहेत, असेही पंड्या यांनी यावेळी सांगितले, की निर्यातीला चालना देणे, रोजगाराची निर्मिती करणे, दागिने उद्योगात मूल्यवर्धन करणे यासारखे उद्देश ठरवण्यात आले आहेत. या उद्योगात येण्यासाठी अनेक तरुण उत्सुक असून या क्षेत्रात चांगला पैसा मिळू शकतो. यासाठी जेम्स अँड ज्वेलरी उद्योगाला पूरक प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. म्हणून या विषयाचे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची तयारी कौन्सिलने सुरू केली आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने नवी मुंबईत जागू देऊ, असे आश्वासनही दिल्याचे पंड्या यांनी सांगितले.
हिऱ्यांना पैलू पाडण्याच्या व्यवसायात भारताने जगभरात नाव कमावले आहे. या हिऱ्यांची निर्यातही मोठ्या प्रमाणावर होत आहे. ही निर्यात १० टक्क्यांनी वाढल्यास एक लाख रोजगार वाढतात. आज या क्षेत्रात १२ लाख लोक काम करत आहेत. त्यामुळे हे क्षेत्र रोजगार देमारे क्षेत्र आहे. मात्र सध्या कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर उणीव आहे. जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान आज भारताकडे आहे. परंतु केवळ कुशल मनुष्यबळ नसल्यामुळे आपण मागे पडतो, अशी खंतही प्रवीणशंकर पंड्या यांनी व्यक्त केली.