अ‍ॅपशहर

अर्थव्यवस्थेला मिळणार चौथा 'बूस्टर डोस'

सुस्तावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी अर्थ मंत्रालय आणखी एक 'बूस्टर डोस' देण्याची तयारी करत आहे. आर्थिक विकासदर गेल्या साडेसहा वर्षांतील निचांकी पातळीवर आला असून त्याला पुन्हा ट्रॅकवर आणण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा मसुदा तयार आहे. येत्या काही दिवसांत अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्याची घोषणा करतील, असे अर्थ मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Sep 2019, 9:00 pm
नवी दिल्ली: सुस्तावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी अर्थ मंत्रालय आणखी एक 'बूस्टर डोस' देण्याची तयारी करत आहे. आर्थिक विकासदर गेल्या साडेसहा वर्षांतील निचांकी पातळीवर आला असून त्याला पुन्हा ट्रॅकवर आणण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा मसुदा तयार आहे. येत्या काही दिवसांत अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्याची घोषणा करतील, असे अर्थ मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Nirmala-Sitharaman


अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ दूर करण्यासाठी केंद्र सरकारने याआधी तीन टप्प्यांत महत्त्वाची अशी पावलं उचलली. त्यात रियल इस्टेटसाठी स्पेशल विंडो, एक्स्पोर्ट इन्सेंटिव्ह बँकांचं विलीनीकरण, एमएसएमई आणि ऑटोमोबाइल क्षेत्राला दिलासा देणाऱ्या निर्णयांचा समावेश आहे. यानंतर आता चौथं मोठं पाऊल केंद्र सरकार उचलणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली. संबंधित अधिकाऱ्याने अधिक तपशील मात्र दिलेला नाही.

दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन अर्थव्यवस्थेवर मतप्रदर्शन केलं होतं. केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तीन टप्प्यांत अनेक उपाययोजनांची घोषणा केली आहे आणि यापुढेही आणखी महत्त्वाची पावले उचलली जातील अशी अपेक्षा असल्याचे दास म्हणाले होते. योग्य उपाययोजना केल्यास अर्थव्यवस्थेला निश्चितच बळकटी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज