नवी दिल्ली: 'देशात रोखीच्या चलनाचं कुठलंही संकट नाही. बाजारात आणि बँकांमध्येही पुरेशा प्रमाणात रोकड उपलब्ध आहे. काही ठिकाणी नोटांची मागणी अचानक वाढल्यानं एटीएममधील रोकड संपली आहे. मात्र, ही तात्पुरती परिस्थिती आहे. लवकरच सारं काही सुरळीत होईल,' असा खुलासा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एटीएममधील खडखडाटावर दिला आहे.
उत्तर प्रदेशसह देशातील ९ राज्यांत चलनतुटवडा निर्माण झाला आहे. देशातील अनेक एटीएमबाहेर 'नो कॅशचे बोर्ड'ही लागले आहेत. अचानक एटीएममध्ये पैशांचा तुटवडा निर्माण झाल्याने लोकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. रोकड असलेल्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी लोकांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अरुण जेटली यांनी ट्विटरद्वारे नागरिकांना आश्वस्त केलं आहे.
'मी देशातील कॅशच्या समस्येचा आढावा घेतला आहे. देशात बाजारात आणि बँकांमध्ये मुबलक प्रमाणात रोकड उपलब्ध आहे. काही ठिकाणी रोख रकमेची मागणी वाढल्याने नोटांचा तुटवडा निर्माण झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे,' असं जेटली यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
'रिझर्व्ह बँकेकडे सध्या १ लाख २५ हजार कोटींची रोकड उपलब्ध आहे. परंतु विषम परिस्थिती निर्माण झाल्याने काही राज्यांत अधिक रोकड आणि काही राज्यांत तुटवडा निर्माण झाला आहे. ही समस्या सोडविण्यासाठी सरकारनं राज्यनिहाय समित्या स्थापन केल्या असून रिझर्व्ह बँकेनंही एक समिती स्थापन केली आहे. राज्या-राज्यांमध्ये रोख रकमेचं आदान-प्रदान व्हावं यासाठी या समित्या महत्त्वाची भूमिका पार पाडतील, असं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी सांगितलं.
अमरावती, चंद्रपुरात खडखडाट
उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगण, आंध्र प्रदेश, आसाम, कर्नाटक, राजस्थान आणि मध्यप्रदेश आदी राज्यांत लोकांनी गरजेपेक्षा जास्त रक्कम एटीएममधून काढल्यानं चलन तुटवडा निर्माण झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. अमरावती आणि चंद्रपुरात चलन तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत असल्याचंही सूत्रांनी स्पष्ट केलं. दरम्यान, येत्या ५ ते ७ दिवसांत परिस्थिती पूर्ववत होईल, असं बँकांचे सचिव राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं.
उत्तर प्रदेशसह देशातील ९ राज्यांत चलनतुटवडा निर्माण झाला आहे. देशातील अनेक एटीएमबाहेर 'नो कॅशचे बोर्ड'ही लागले आहेत. अचानक एटीएममध्ये पैशांचा तुटवडा निर्माण झाल्याने लोकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. रोकड असलेल्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी लोकांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अरुण जेटली यांनी ट्विटरद्वारे नागरिकांना आश्वस्त केलं आहे.
'मी देशातील कॅशच्या समस्येचा आढावा घेतला आहे. देशात बाजारात आणि बँकांमध्ये मुबलक प्रमाणात रोकड उपलब्ध आहे. काही ठिकाणी रोख रकमेची मागणी वाढल्याने नोटांचा तुटवडा निर्माण झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे,' असं जेटली यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
'रिझर्व्ह बँकेकडे सध्या १ लाख २५ हजार कोटींची रोकड उपलब्ध आहे. परंतु विषम परिस्थिती निर्माण झाल्याने काही राज्यांत अधिक रोकड आणि काही राज्यांत तुटवडा निर्माण झाला आहे. ही समस्या सोडविण्यासाठी सरकारनं राज्यनिहाय समित्या स्थापन केल्या असून रिझर्व्ह बँकेनंही एक समिती स्थापन केली आहे. राज्या-राज्यांमध्ये रोख रकमेचं आदान-प्रदान व्हावं यासाठी या समित्या महत्त्वाची भूमिका पार पाडतील, असं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी सांगितलं.
अमरावती, चंद्रपुरात खडखडाट
उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगण, आंध्र प्रदेश, आसाम, कर्नाटक, राजस्थान आणि मध्यप्रदेश आदी राज्यांत लोकांनी गरजेपेक्षा जास्त रक्कम एटीएममधून काढल्यानं चलन तुटवडा निर्माण झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. अमरावती आणि चंद्रपुरात चलन तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत असल्याचंही सूत्रांनी स्पष्ट केलं. दरम्यान, येत्या ५ ते ७ दिवसांत परिस्थिती पूर्ववत होईल, असं बँकांचे सचिव राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं.