वृत्तसंस्था, मुंबई
टाटा ट्रस्टमध्ये प्रशासनाचा अभाव असल्यामुळे यात सरकारने हस्तक्षेप करणे गरजेचे झाले आहे. असा हस्तक्षेप करून सरकारने टाटा ट्रस्टच्या कारभाराला शिस्त लावावी व पारदर्शक प्रशासन सुस्थापित करावे, असे आवाहन पदच्युत अध्यक्ष सायरस मिस्त्री यांनी केले आहे.
कंपनीच्या ज्या भागधारकांना वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे, त्यांना मिस्री यांनी पत्रे पाठवली आहेत. टाटा समूहाची सूत्रे सध्या एकाच व्यक्तीच्या हातात आहेत; हे समूहासाठी योग्य नाही. टाटा समूहाची भविष्यातील वाटचाल स्पष्ट होण्यासाठी सर्वच भागधारकांनी योगदान देण्याची गरज आहे, असे मिस्त्री यांनी पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान, ग्लोबल प्रॉक्सी अॅडव्हायझरी फर्म आयएसएसने टीसीएसच्या भागधारकांना मिस्त्री यांच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. अन्य दोन अॅडव्हायझरी संस्थांनीही मिस्त्री यांच्या बाजूने मतदान करण्याचा सल्ला छोट्या भागधारकांना दिला आहे.
टाटा ट्रस्टमध्ये प्रशासनाचा अभाव असल्यामुळे यात सरकारने हस्तक्षेप करणे गरजेचे झाले आहे. असा हस्तक्षेप करून सरकारने टाटा ट्रस्टच्या कारभाराला शिस्त लावावी व पारदर्शक प्रशासन सुस्थापित करावे, असे आवाहन पदच्युत अध्यक्ष सायरस मिस्त्री यांनी केले आहे.
कंपनीच्या ज्या भागधारकांना वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे, त्यांना मिस्री यांनी पत्रे पाठवली आहेत. टाटा समूहाची सूत्रे सध्या एकाच व्यक्तीच्या हातात आहेत; हे समूहासाठी योग्य नाही. टाटा समूहाची भविष्यातील वाटचाल स्पष्ट होण्यासाठी सर्वच भागधारकांनी योगदान देण्याची गरज आहे, असे मिस्त्री यांनी पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान, ग्लोबल प्रॉक्सी अॅडव्हायझरी फर्म आयएसएसने टीसीएसच्या भागधारकांना मिस्त्री यांच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. अन्य दोन अॅडव्हायझरी संस्थांनीही मिस्त्री यांच्या बाजूने मतदान करण्याचा सल्ला छोट्या भागधारकांना दिला आहे.