नवी दिल्ली:
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या मोदी सरकारनं आज शेतकऱ्यांना खूशखबर दिली. दुष्काळ व नापिकीच्या समस्येला तोंड देणाऱ्या देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा करण्याची घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे. दोन हेक्टरपर्यंत शेतजमिनीची मालकी असलेल्या शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार असून एकूण १२ कोटी शेतकऱ्याना याचा लाभ होणार आहे.
गेल्या साडेचार वर्षांत सरकारनं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. याच प्रयत्नांचा भाग म्हणून पिकांच्या किमान आधारभूत किंमतीमध्येही वाढ करण्यात आली आहे. याशिवाय, आता वर्षाला थेट सहा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतील. दोन-दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये हे पैसे दिले जातील. या योजनेपोटी सरकारी तिजोरीवर एकूण ७५ हजार कोटींचा भार पडणार आहे. १ डिसेंबर २०१८ पासून ही योजना लागू होणार असून लवकरच पहिला हप्ता शेतकऱ्यांना दिला जाईल, असं पीयूष गोयल यांनी सांगितलं.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या मोदी सरकारनं आज शेतकऱ्यांना खूशखबर दिली. दुष्काळ व नापिकीच्या समस्येला तोंड देणाऱ्या देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा करण्याची घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे. दोन हेक्टरपर्यंत शेतजमिनीची मालकी असलेल्या शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार असून एकूण १२ कोटी शेतकऱ्याना याचा लाभ होणार आहे.
गेल्या साडेचार वर्षांत सरकारनं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. याच प्रयत्नांचा भाग म्हणून पिकांच्या किमान आधारभूत किंमतीमध्येही वाढ करण्यात आली आहे. याशिवाय, आता वर्षाला थेट सहा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतील. दोन-दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये हे पैसे दिले जातील. या योजनेपोटी सरकारी तिजोरीवर एकूण ७५ हजार कोटींचा भार पडणार आहे. १ डिसेंबर २०१८ पासून ही योजना लागू होणार असून लवकरच पहिला हप्ता शेतकऱ्यांना दिला जाईल, असं पीयूष गोयल यांनी सांगितलं.