अ‍ॅपशहर

शुल्काचा पुनर्विचार करा

रोखीच्या व्यवहारांवर खातेदारांकडून शुल्क घेण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती भारतीय स्टेट बँकेला केंद्र सरकारने केली आहे.

Maharashtra Times 7 Mar 2017, 12:23 am
नवी दिल्ली: रोखीच्या व्यवहारांवर खातेदारांकडून शुल्क घेण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती भारतीय स्टेट बँकेला केंद्र सरकारने केली आहे. खात्यामध्ये किमान रक्कम राखता आली नाही तर बँक दंडात्मक शुल्क वसूल करणार आहे. त्याचा जाच सर्वसामान्य खातेदारांना होणार आहे. त्यामुळेच हा पुनर्विचाराचा सल्ला सरकारने दिला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम govt asks sbi to reconsider cash withdrawal charges minimum balance penalty
शुल्काचा पुनर्विचार करा


स्टेट बँकेसह तीन खासगी बँका १ एप्रिलपासून शुल्क आकारणार आहेत. सरकारने अॅक्सिस, एचडीएफसी व आयसीआयसीआय या बँकांनाही पुनर्विचार करण्यास सांगितले आहे. यापूर्वी स्टेट बँकेने २०१२मध्ये बचत खात्यात किमान रक्कम न ठेवल्याबद्दल दंड आकारला होता. तसाच दंड व सेवाकर यावर्षीपासून आकारण्याचे बँकेने ठरवले आहे. यामुळे स्टेट बँकेसह तिन्ही खासगी बँकांच्या उत्पन्नात कोट्यवधी रुपयांची भर पडणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज