वृत्तसंस्था, नवी दिल्ली
सरकारस्थापनेच्या पहिल्या १०० दिवसांत 'फाइव्ह जी'ची चाचणी, देशभरात पाच लाख वायफाय हॉटस्पॉट उभारणे आदी उद्दिष्टे आम्ही आखली आहेत. तसेच, एमटीएनएल व बीएसएनएल या सरकारी दूरसंचार कंपन्यांना सुस्थितीत आणणे हेही आमच्या सरकारचे उद्दिष्ट आहे , असे दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सोमवारी सांगितले.
केंद्रीय दूरसंचार मंत्रालयातर्फे चालू वर्षातच फाइव्ह जी व अन्य बॅण्डसंबंधीच्या स्पेक्ट्रम लिलावाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असेही ते म्हणाले. सोशल मीडियास तंबी सोशल मीडियातील प्रमुख कंपन्यांनी भारतीय संविधानाचे, संबंधित नियमांचे पावित्र्य राखावे तसेच, धर्मांधता व दहशतवादासारख्या कृत्यांसाठी आपल्या मंचाचा गैरवापर होत नाही ना, याची या माध्यमांनी काळजी घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सरकारस्थापनेच्या पहिल्या १०० दिवसांत 'फाइव्ह जी'ची चाचणी, देशभरात पाच लाख वायफाय हॉटस्पॉट उभारणे आदी उद्दिष्टे आम्ही आखली आहेत. तसेच, एमटीएनएल व बीएसएनएल या सरकारी दूरसंचार कंपन्यांना सुस्थितीत आणणे हेही आमच्या सरकारचे उद्दिष्ट आहे , असे दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सोमवारी सांगितले.
केंद्रीय दूरसंचार मंत्रालयातर्फे चालू वर्षातच फाइव्ह जी व अन्य बॅण्डसंबंधीच्या स्पेक्ट्रम लिलावाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असेही ते म्हणाले. सोशल मीडियास तंबी सोशल मीडियातील प्रमुख कंपन्यांनी भारतीय संविधानाचे, संबंधित नियमांचे पावित्र्य राखावे तसेच, धर्मांधता व दहशतवादासारख्या कृत्यांसाठी आपल्या मंचाचा गैरवापर होत नाही ना, याची या माध्यमांनी काळजी घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.