नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेतील ११ हजार ३०० कोटींच्या घोटाळ्यातील सहआरोपी मेहुल चोक्सी यानं त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. 'माझ्या नशिबात जे आहे, ते होईल. पण मी काहीही चुकीचं केलेलं नाही. मला या प्रकरणात चुकीच्या पद्धतीनं गोवण्यात आलंय. सत्य लवकरच समोर येईल,' असा कांगावा चोक्सीनं केला आहे.
मेहुल चोक्सी हा पीएनबी घोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार नीरव मोदी याचा मामा आहे. हे दोघेही व्यावसायिक भागीदार असल्यानं पीएनबी घोटाळ्यात चोक्सीला सहआरोपी करण्यात आलं आहे. सक्तवसुली संचलनालयानं त्यांच्या भोवती कारवाईचा फास आवळला असून नीरव मोदीशी संबंधित १४४ संशयित कंपन्यांची चौकशी सुरू केली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मेहुल चोक्सीनं त्याच्या कंपनीच्या साडेतीन हजार कर्मचाऱ्यांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. चोक्सीचे वकील संजय अॅबॉट यांनी हे पत्र सार्वजनिक केलं आहे. या पत्राद्वारे कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करताना चोक्सीनं सरकारवर जोरदार टीका केली आहे.
'सरकारी तपास यंत्रणा ज्या पद्धतीनं काम करताहेत, त्यामुळं मला खूपच अडचणींना सामोरं जावं लागतंय. कुठला तरी मोठा अनर्थ ओढवल्यासारखं वातावरण तपास यंत्रणांनी निर्माण केलंय. अन्यायी पद्धतीनं कारवाई सुरू आहे. त्यामुळं मला काम करणंही अशक्य होऊन बसलंय. सगळं काही ठप्प झाल्यानं कर्मचाऱ्यांनी इतरत्र नोकऱ्या शोधाव्यात. सरकारनं माझ्या मालमत्ता आणि बँक खाती सील केल्यानं मी तुमची देणी देण्यास असमर्थ आहे, असं चोक्सीनं पत्रात म्हटलं आहे. 'देणी दिली जात नाहीत, तोपर्यंत कंपनीचे लॅपटॉप, मोबाइल कर्मचारी वापरू शकतात. गरज पडल्यास सर्वांना अनुभवाचं प्रमाणपत्र दिलं जाईल. सर्व काही सुरळीत झाल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांची थकीत देणी दिली जातील,' असंही त्यानं पत्रात नमूद केलं आहे.
मेहुल चोक्सी हा पीएनबी घोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार नीरव मोदी याचा मामा आहे. हे दोघेही व्यावसायिक भागीदार असल्यानं पीएनबी घोटाळ्यात चोक्सीला सहआरोपी करण्यात आलं आहे. सक्तवसुली संचलनालयानं त्यांच्या भोवती कारवाईचा फास आवळला असून नीरव मोदीशी संबंधित १४४ संशयित कंपन्यांची चौकशी सुरू केली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मेहुल चोक्सीनं त्याच्या कंपनीच्या साडेतीन हजार कर्मचाऱ्यांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. चोक्सीचे वकील संजय अॅबॉट यांनी हे पत्र सार्वजनिक केलं आहे. या पत्राद्वारे कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करताना चोक्सीनं सरकारवर जोरदार टीका केली आहे.
'सरकारी तपास यंत्रणा ज्या पद्धतीनं काम करताहेत, त्यामुळं मला खूपच अडचणींना सामोरं जावं लागतंय. कुठला तरी मोठा अनर्थ ओढवल्यासारखं वातावरण तपास यंत्रणांनी निर्माण केलंय. अन्यायी पद्धतीनं कारवाई सुरू आहे. त्यामुळं मला काम करणंही अशक्य होऊन बसलंय. सगळं काही ठप्प झाल्यानं कर्मचाऱ्यांनी इतरत्र नोकऱ्या शोधाव्यात. सरकारनं माझ्या मालमत्ता आणि बँक खाती सील केल्यानं मी तुमची देणी देण्यास असमर्थ आहे, असं चोक्सीनं पत्रात म्हटलं आहे. 'देणी दिली जात नाहीत, तोपर्यंत कंपनीचे लॅपटॉप, मोबाइल कर्मचारी वापरू शकतात. गरज पडल्यास सर्वांना अनुभवाचं प्रमाणपत्र दिलं जाईल. सर्व काही सुरळीत झाल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांची थकीत देणी दिली जातील,' असंही त्यानं पत्रात नमूद केलं आहे.