वृत्तसंस्था, मुंबई
रेपो दरात पाव टक्क्यांची वाढ करण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे देशातील वाढत्या महागाईवर जणू शिक्कामोर्तबच झाले आहे. रेपो दर वाढण्यामुळे गृहकर्ज महागण्याचा धोका निर्माण झाला आहे. या वाढीमुळे रेपो रेट आता ६.५० टक्क्यांवर गेला आहे. या पूर्वी जूनमध्ये रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पाव टक्क्यांची वाढ केली होती. या माध्यमातून साडेचार वर्षांत प्रथमच व्याजदरात वाढ झाली होती. ऑक्टोबर २०१३नंतर सलग दोनदा रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली आहे. या निर्णयामुळे कर्जे महाग होणार असली तरी, बँकांमध्ये ठेवी ठेवणाऱ्यांचा फायदाच होणार आहे. बँकांकडून मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. या शिवाय रिझर्व्ह बँकेने रिव्हर्स रेपो दरातही वाढ केल्यामुळे तो ६ टक्क्यांवरून ६.२५ टक्क्यांवर गेला आहे.
सलग दुसऱ्यांदा वाढ
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या (एमपीसी) पाच सदस्यांनी रेपो रेट वाढविण्याच्या बाजूने तर, एका सदस्याने विरोधात कौल दिला. समितीचे बाह्य सदस्य रवींद्र ढोलकिया यांनी व्याजदरात वाढ करण्याच्या निर्णयाचा विरोध केला. जूनमध्ये झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दरात पाव टक्का वाढ करण्याची शिफारस केली होती.
महागाईवाढीचा परिणाम
पतधोरण समितीच्या बैठकीत वाढत्या महागाईवर चिंता व्यक्त करण्यात आली. जूनमध्ये किरकोळ महागाई पाच टक्क्यांच्या पातळीवर पोहोचली होती. हा गेल्या पाच महिन्यांतील उच्चांक होता. एप्रिल ते जूनपर्यंत किरकोळ महागाई सरासरी ४.८ टक्क्यांवर होती. त्यामुळे जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये किरकोळ महागाई ४.६ टक्क्यांवर राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या सहामाहीत महागाई ४.८ टक्क्यांवर जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. यापूर्वी हा दर ४.७ टक्के राही, असा अंदाज होता.
ईएमआयला फटका
रेपो दरात वाढ झाल्याचा परिणाम थेट ग्राहकांच्या कर्जांचे हप्ते वाढण्यावर होतो. रेपो दरात वाढ होण्याचा दुसरा अर्थ बँकांच्या 'एमसीएलआर'मध्ये वाढ होणे असा आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वच बँकांनी 'एमसीएलआर'मध्ये वाढ केली होती. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार गृहकर्जासह सर्व प्रकारची कर्जे १ एप्रिल २०१६पासून 'एमसीएलआर'शी जोडली गेली आहेत. गेल्या दोन पतधोरण आढाव्यानंतर रेपो दरात पन्नास बेसिस पॉइंटची वाढ झाली आहे. खालील तक्त्यावरून रेपो दरात वाढ झाल्यावर कर्जाच्या हप्त्यात कशी वाढ होते, याचा अंदाज येईल. ३० लाखांचे गृहकर्ज २० वर्षांसाठी घेतले असेल तर, सध्याच्या ८.५० टक्के व्याजदराच्या हिशेबाने कर्जाचा हप्ता २६,०३४ रुपये बसेल. मात्र, व्याजदर वाढून ८.७५ टक्क्यांवर गेल्या नंतर गृहकर्जाच्या हप्त्यामध्ये ४७७ रुपयांची वाढ होऊन तो २६,५११ रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. तसेच, एकूण व्याजातील वाढ १,१४, ४८० रुपये होईल. याचप्रकारे २० वर्षांसाठी घेण्यात आलेल्या ७५ लाख रुपयांच्या कर्जावरील ईएमआयमध्ये ११९२ रुपयांची वाढ होईल. तसेच, एकूण व्याजात २,८६,०८० रुपयांची वाढ होईल.
रेपो दरात पाव टक्क्यांची वाढ करण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे देशातील वाढत्या महागाईवर जणू शिक्कामोर्तबच झाले आहे. रेपो दर वाढण्यामुळे गृहकर्ज महागण्याचा धोका निर्माण झाला आहे. या वाढीमुळे रेपो रेट आता ६.५० टक्क्यांवर गेला आहे. या पूर्वी जूनमध्ये रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पाव टक्क्यांची वाढ केली होती. या माध्यमातून साडेचार वर्षांत प्रथमच व्याजदरात वाढ झाली होती. ऑक्टोबर २०१३नंतर सलग दोनदा रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली आहे. या निर्णयामुळे कर्जे महाग होणार असली तरी, बँकांमध्ये ठेवी ठेवणाऱ्यांचा फायदाच होणार आहे. बँकांकडून मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. या शिवाय रिझर्व्ह बँकेने रिव्हर्स रेपो दरातही वाढ केल्यामुळे तो ६ टक्क्यांवरून ६.२५ टक्क्यांवर गेला आहे.
सलग दुसऱ्यांदा वाढ
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या (एमपीसी) पाच सदस्यांनी रेपो रेट वाढविण्याच्या बाजूने तर, एका सदस्याने विरोधात कौल दिला. समितीचे बाह्य सदस्य रवींद्र ढोलकिया यांनी व्याजदरात वाढ करण्याच्या निर्णयाचा विरोध केला. जूनमध्ये झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दरात पाव टक्का वाढ करण्याची शिफारस केली होती.
महागाईवाढीचा परिणाम
पतधोरण समितीच्या बैठकीत वाढत्या महागाईवर चिंता व्यक्त करण्यात आली. जूनमध्ये किरकोळ महागाई पाच टक्क्यांच्या पातळीवर पोहोचली होती. हा गेल्या पाच महिन्यांतील उच्चांक होता. एप्रिल ते जूनपर्यंत किरकोळ महागाई सरासरी ४.८ टक्क्यांवर होती. त्यामुळे जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये किरकोळ महागाई ४.६ टक्क्यांवर राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या सहामाहीत महागाई ४.८ टक्क्यांवर जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. यापूर्वी हा दर ४.७ टक्के राही, असा अंदाज होता.
ईएमआयला फटका
रेपो दरात वाढ झाल्याचा परिणाम थेट ग्राहकांच्या कर्जांचे हप्ते वाढण्यावर होतो. रेपो दरात वाढ होण्याचा दुसरा अर्थ बँकांच्या 'एमसीएलआर'मध्ये वाढ होणे असा आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वच बँकांनी 'एमसीएलआर'मध्ये वाढ केली होती. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार गृहकर्जासह सर्व प्रकारची कर्जे १ एप्रिल २०१६पासून 'एमसीएलआर'शी जोडली गेली आहेत. गेल्या दोन पतधोरण आढाव्यानंतर रेपो दरात पन्नास बेसिस पॉइंटची वाढ झाली आहे. खालील तक्त्यावरून रेपो दरात वाढ झाल्यावर कर्जाच्या हप्त्यात कशी वाढ होते, याचा अंदाज येईल. ३० लाखांचे गृहकर्ज २० वर्षांसाठी घेतले असेल तर, सध्याच्या ८.५० टक्के व्याजदराच्या हिशेबाने कर्जाचा हप्ता २६,०३४ रुपये बसेल. मात्र, व्याजदर वाढून ८.७५ टक्क्यांवर गेल्या नंतर गृहकर्जाच्या हप्त्यामध्ये ४७७ रुपयांची वाढ होऊन तो २६,५११ रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. तसेच, एकूण व्याजातील वाढ १,१४, ४८० रुपये होईल. याचप्रकारे २० वर्षांसाठी घेण्यात आलेल्या ७५ लाख रुपयांच्या कर्जावरील ईएमआयमध्ये ११९२ रुपयांची वाढ होईल. तसेच, एकूण व्याजात २,८६,०८० रुपयांची वाढ होईल.