नवी दिल्ली : दुचाकी वाहनांच्या विक्रीच्या बाबतीत भारतीय बाजारपेठेने चीनला मागे टाकून अव्वल क्रमांक पटकावला आहे. गेल्या वर्षी देशात १.७७ कोटी दुचाकींची विक्री झाली. याचाच अर्थ प्रति दिन ४८,००० पेक्षा अधिक दुचाकींची विक्री झाली. चीनमधील गेल्या वर्षी एकूण १.६८ कोटी दुचाकींची विक्री झाली.
‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स’ (सियाम) आणि चायना असोसिएशन ऑफ ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स यांच्यातर्फे प्रसिद्ध आकडेवारीवरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. देशाच्या ग्रामीण भागात उत्पन्नात वाढ झाल्याने, तसेच पायाभूत सोयीसुविधांचा विस्तार झाल्याने आणि महिला ग्राहकांचा वाढता सहभाग या कारणांमुळे दुचाकींच्या विक्रीचा उच्चांक नोंदविण्यात आला आहे.
‘सियाम’चे महासंचालक सुगतो घोष म्हणाले की, ‘चीनमधील दुचाकी वाहनांच्या बाजारपेठेने काही वर्षांपूर्वी उच्चांकी पातळी गाठली होती. त्यानंतर तेथील बाजारपेठ सातत्याने घसरू लागली. दुचाकी वाहनांच्या बाजारपेठेत आता भारत अव्वल क्रमांकावर असून, त्यापाठोपाठ चीन आणि इंडोनेशियाचा अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक लागतो. इंडोनेशियात गेल्या वर्षी ६० लाख तर, २०१५मध्ये ६५ लाख दुचाकी वाहनांची विक्री झाली.’
‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स’ (सियाम) आणि चायना असोसिएशन ऑफ ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स यांच्यातर्फे प्रसिद्ध आकडेवारीवरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. देशाच्या ग्रामीण भागात उत्पन्नात वाढ झाल्याने, तसेच पायाभूत सोयीसुविधांचा विस्तार झाल्याने आणि महिला ग्राहकांचा वाढता सहभाग या कारणांमुळे दुचाकींच्या विक्रीचा उच्चांक नोंदविण्यात आला आहे.
‘सियाम’चे महासंचालक सुगतो घोष म्हणाले की, ‘चीनमधील दुचाकी वाहनांच्या बाजारपेठेने काही वर्षांपूर्वी उच्चांकी पातळी गाठली होती. त्यानंतर तेथील बाजारपेठ सातत्याने घसरू लागली. दुचाकी वाहनांच्या बाजारपेठेत आता भारत अव्वल क्रमांकावर असून, त्यापाठोपाठ चीन आणि इंडोनेशियाचा अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक लागतो. इंडोनेशियात गेल्या वर्षी ६० लाख तर, २०१५मध्ये ६५ लाख दुचाकी वाहनांची विक्री झाली.’