वृत्तसंस्था, नवी दिल्ली
पासपोर्ट आणि पासपोर्ट संदर्भातील सेवा मार्च महिन्यापासून देशभरातील निवडक पोस्ट कार्यालयांमध्ये उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली.
पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील बीड आणि औरंगाबादबरोबर पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रे राजस्थानातील कोटा, जैसलमेर, बिकानेर, झुनझुनन आणि झालवार येथे सुरू होणार आहेत. ‘३१ मार्चपूर्वी निवडक पोस्ट कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्रे सुरू व्हावीत, असा आमचा प्रयत्न असणार आहे.
नव्याने सुरुवात होणाऱ्या पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्रांची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाइटवरही प्रदर्शित करण्यात येणार आहेत. या शिवाय ओडिशातील रूरकेला, संबळपूर आणि कोरापूटमध्येही ही केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत, असेही ट्विट स्वराज यांनी केले.
पोस्ट कार्यालयांत पासपोर्ट देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता. त्यावर आता अंमलबजावणी होणार आहे. त्यासाठी आवश्यक ते बदल पोस्ट कार्यलयांतून करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. पासपोर्ट घेण्यास इच्छुक असलेल्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी वेगळी यंत्रणा निर्माण करावी लागणार आहे.
यासाठी पोस्ट कार्यालयांचे रूपांतर पासपोर्ट सेवा केंद्रांमध्ये केले जाईल. अशी ५६ केंद्रे लवकरच सुरू होतील. ही केंद्रे आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, हरयाणा यासारख्या निवडक राज्यांतून पहिल्या टप्प्यांत सुरू होतील. यापूर्वी पासपोर्ट संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी टपाल खात्याने घेतली होती.
पासपोर्ट आणि पासपोर्ट संदर्भातील सेवा मार्च महिन्यापासून देशभरातील निवडक पोस्ट कार्यालयांमध्ये उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली.
पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील बीड आणि औरंगाबादबरोबर पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रे राजस्थानातील कोटा, जैसलमेर, बिकानेर, झुनझुनन आणि झालवार येथे सुरू होणार आहेत. ‘३१ मार्चपूर्वी निवडक पोस्ट कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्रे सुरू व्हावीत, असा आमचा प्रयत्न असणार आहे.
नव्याने सुरुवात होणाऱ्या पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्रांची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाइटवरही प्रदर्शित करण्यात येणार आहेत. या शिवाय ओडिशातील रूरकेला, संबळपूर आणि कोरापूटमध्येही ही केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत, असेही ट्विट स्वराज यांनी केले.
पोस्ट कार्यालयांत पासपोर्ट देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता. त्यावर आता अंमलबजावणी होणार आहे. त्यासाठी आवश्यक ते बदल पोस्ट कार्यलयांतून करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. पासपोर्ट घेण्यास इच्छुक असलेल्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी वेगळी यंत्रणा निर्माण करावी लागणार आहे.
यासाठी पोस्ट कार्यालयांचे रूपांतर पासपोर्ट सेवा केंद्रांमध्ये केले जाईल. अशी ५६ केंद्रे लवकरच सुरू होतील. ही केंद्रे आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, हरयाणा यासारख्या निवडक राज्यांतून पहिल्या टप्प्यांत सुरू होतील. यापूर्वी पासपोर्ट संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी टपाल खात्याने घेतली होती.