इकॉनॉमिक टाइम्स, नवी दिल्ली
येत्या पाच वर्षांत गुंतवणुकीसाठी भारत हा जगातील सर्वाधिक पसंतीचा देश ठरेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हा आशावाद व्यक्त केला.
जम्मू आणि काश्मीरला लागू असलेले ३७० कलम हटवण्याचा निर्णय हा पूर्ण विचाराअंती घेण्यात आला असून यामुळे काश्मीरमध्ये स्थैर्य, व्यापारवाढ व सुलभ कायदे या आधारे उद्योगधंदे वाढीस लागतील. खुली मने व खुल्या बाजारपेठेच्या साह्याने तेथील तरुणांना प्रगतीपथावर येता येईल व त्यातून काश्मीरची भरभराट होईल, असे ते म्हणाले.
सद्यस्थितीत अर्थव्यवस्थेला आलेल्या मरगळीबाबतही त्यांनी भाष्य केले. आपल्या देशात प्रचंड क्षमता आहे हे उद्योजकांनी जोखण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मी त्यांना प्रेरित करू इच्छितो. मनात कोणतीही शंका न बाळगता त्यांनी त्यांच्या गुंतवणूक योजना पुढे न्याव्यात. सर्व प्रामाणिक व कायद्याला धरून चालणाऱ्या उद्योगांना सरकारकडून पुरेपूर साह्य मिळेल. अर्थव्यवस्थेची मंदावलेली गती हा संक्रमणाचा एक भाग आहे. पतपुरवठा, काही नियमबदल याच्या साह्याने मागणीत पुन्हा एकदा मोठी वाढ होईल व उद्योगक्षेत्रही नवी झेप घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ई-वाहनांना चालना
ई-वाहनांना प्रोत्साहन देऊन पारंपरिक इंधनांवरील अवलंबित्व कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र आपल्या देशाची बाजारपेठ एवढी व्यापक आहे की ई-वाहन धोरण राबवले तरी पारंपरिक (आयसीई) इंजिनच्या वाहनांची मागणी घटणार नाही. दोन्ही प्रकारची वाहने एकाचवेळी चांगला बाजारहिस्सा राखू शकतील, असे मोदी म्हणाले.
येत्या पाच वर्षांत गुंतवणुकीसाठी भारत हा जगातील सर्वाधिक पसंतीचा देश ठरेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हा आशावाद व्यक्त केला.
जम्मू आणि काश्मीरला लागू असलेले ३७० कलम हटवण्याचा निर्णय हा पूर्ण विचाराअंती घेण्यात आला असून यामुळे काश्मीरमध्ये स्थैर्य, व्यापारवाढ व सुलभ कायदे या आधारे उद्योगधंदे वाढीस लागतील. खुली मने व खुल्या बाजारपेठेच्या साह्याने तेथील तरुणांना प्रगतीपथावर येता येईल व त्यातून काश्मीरची भरभराट होईल, असे ते म्हणाले.
सद्यस्थितीत अर्थव्यवस्थेला आलेल्या मरगळीबाबतही त्यांनी भाष्य केले. आपल्या देशात प्रचंड क्षमता आहे हे उद्योजकांनी जोखण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मी त्यांना प्रेरित करू इच्छितो. मनात कोणतीही शंका न बाळगता त्यांनी त्यांच्या गुंतवणूक योजना पुढे न्याव्यात. सर्व प्रामाणिक व कायद्याला धरून चालणाऱ्या उद्योगांना सरकारकडून पुरेपूर साह्य मिळेल. अर्थव्यवस्थेची मंदावलेली गती हा संक्रमणाचा एक भाग आहे. पतपुरवठा, काही नियमबदल याच्या साह्याने मागणीत पुन्हा एकदा मोठी वाढ होईल व उद्योगक्षेत्रही नवी झेप घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ई-वाहनांना चालना
ई-वाहनांना प्रोत्साहन देऊन पारंपरिक इंधनांवरील अवलंबित्व कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र आपल्या देशाची बाजारपेठ एवढी व्यापक आहे की ई-वाहन धोरण राबवले तरी पारंपरिक (आयसीई) इंजिनच्या वाहनांची मागणी घटणार नाही. दोन्ही प्रकारची वाहने एकाचवेळी चांगला बाजारहिस्सा राखू शकतील, असे मोदी म्हणाले.