वृत्तसंस्था, सेऊल
भारतीय अर्थव्यवस्था भक्कम आधारावर उभी असून ती लवकरच पाच हजार अब्ज अमेरिकी डॉलरचा स्तर गाठेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला. द. कोरियाच्या दौऱ्यात ६०० कोरियन कंपनी प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते.
भारत हा संधींचा देश आहे. जगातील कोणतीही मोठी अर्थव्यवस्था सात टक्के विकासदरासह वृद्धिंगत होताना दिसत नाही. भारताने मात्र सातत्याने हा दर साधला आहे, असे मोदी म्हणाले. द. कोरियाचे ह्युंदाई, सॅमसंग, एलजी हे ब्रँड भारतात स्थिरस्थावर झाले असून आणखी काही ब्रँड भारतात प्रवेश करतील. यामध्ये किआ या कार उत्पादक कंपनीचा समावेश असून या कंपनीचा भारतातील व्यवसाय लवकरच सुरू होईल, असे मोदी म्हणाले. द. कोरियातील व्यावसायिक व अन्य नागरिकांना भारतात येणे सुलभ व्हावे यासाठी गेल्या ऑक्टोबरपासून भारतात आल्यानंतर व्हिसा देण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
लक्ष्य टॉप ५०चे
जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे तसेच, अन्य आर्थिक निर्णयांमुळे व्यवसाय सुलभतेच्या जागतिक सूचीमध्ये भारताने चार वर्षांत ६५ क्रमांकांची झेप घेऊन ७७वे स्थान पटकावले आहे. पुढील वर्षी पहिल्या ५० देशांमध्ये स्थान मिळवण्याचे लक्ष्य आम्ही आखले आहे, असे मोदी म्हणाले. थेट विदेशी गुंतवणुकीसाठी आमचा देश खुला आहे. विविध व्यापार क्षेत्रांपैकी ९० टक्के व्यापाऱ्यांच्या परवानग्या या मानवी हस्तक्षेपाशिवाय मिळू शकतात. यामुळेच गेल्या चार वर्षांत आम्ही २५० अब्ज अमेरिकी डॉलरची थेट विदेशी गुंतवणूक प्राप्त केली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
भारतीय अर्थव्यवस्था भक्कम आधारावर उभी असून ती लवकरच पाच हजार अब्ज अमेरिकी डॉलरचा स्तर गाठेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला. द. कोरियाच्या दौऱ्यात ६०० कोरियन कंपनी प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते.
भारत हा संधींचा देश आहे. जगातील कोणतीही मोठी अर्थव्यवस्था सात टक्के विकासदरासह वृद्धिंगत होताना दिसत नाही. भारताने मात्र सातत्याने हा दर साधला आहे, असे मोदी म्हणाले. द. कोरियाचे ह्युंदाई, सॅमसंग, एलजी हे ब्रँड भारतात स्थिरस्थावर झाले असून आणखी काही ब्रँड भारतात प्रवेश करतील. यामध्ये किआ या कार उत्पादक कंपनीचा समावेश असून या कंपनीचा भारतातील व्यवसाय लवकरच सुरू होईल, असे मोदी म्हणाले. द. कोरियातील व्यावसायिक व अन्य नागरिकांना भारतात येणे सुलभ व्हावे यासाठी गेल्या ऑक्टोबरपासून भारतात आल्यानंतर व्हिसा देण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
लक्ष्य टॉप ५०चे
जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे तसेच, अन्य आर्थिक निर्णयांमुळे व्यवसाय सुलभतेच्या जागतिक सूचीमध्ये भारताने चार वर्षांत ६५ क्रमांकांची झेप घेऊन ७७वे स्थान पटकावले आहे. पुढील वर्षी पहिल्या ५० देशांमध्ये स्थान मिळवण्याचे लक्ष्य आम्ही आखले आहे, असे मोदी म्हणाले. थेट विदेशी गुंतवणुकीसाठी आमचा देश खुला आहे. विविध व्यापार क्षेत्रांपैकी ९० टक्के व्यापाऱ्यांच्या परवानग्या या मानवी हस्तक्षेपाशिवाय मिळू शकतात. यामुळेच गेल्या चार वर्षांत आम्ही २५० अब्ज अमेरिकी डॉलरची थेट विदेशी गुंतवणूक प्राप्त केली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.