अ‍ॅपशहर

भारतावर GDPच्या ८४% कर्ज, तोटा कमी करण्यासाठी काय करावं लागणार, एका क्लिकवर समजून घ्या

India Debt Ratio: भारतावरील कर्जाचं प्रमाण २०२२ च्या अखेरीस त्याच्या जीडीपीच्या ८४ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे, जे अनेक उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये आघाडीवर असेल, पण त्यांचे कर्ज टिकवणे सोपे आहे, असे IMF च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Oct 2022, 4:42 pm
नवी दिल्ली : जगातील अनेक देशांप्रमाणे भारतही कर्जाच्या जाळ्यात अडकत चालला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या म्हणण्यानुसार २०२२ च्या अखेरीस भारताचे जीडीपीमधील कर्जाचे प्रमाण ८४ टक्के असण्याचा अंदाज आहे, जो सध्या ६९.६२ टक्के आहे. आयएमएफने म्हटले की भारताचे कर्ज आणि जीडीपीचे प्रमाण जगातील सर्व उदयोन्मुख अर्थव्यवस्थांपेक्षा खूप जास्त आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Indias debt ratio expected to reach 84 per cent of its GDP by the end of 2022: IMF


अदानींसाठी मोठी धोक्याची घंटा; कर्ज इतक्या हजार कोटींनी वाढलं
वित्तीय तुटीबाबत स्पष्ट धोरण हवे
आयएमएफने म्हटले की कर्जाचे जीडीपीचे गुणोत्तर वाढेल आणि या कर्जाचा भार उचलण्यात कोणतीही अडचण येणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. आयएमएफच्या आर्थिक व्यवहार विभागाचे उपसंचालक पाओलो मौरो म्हणाले की, भारतासाठी मध्यम मुदतीत वित्तीय तुटीबाबत स्पष्ट धोरण असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ते म्हणाले की, गोष्टी नियंत्रणात आहेत आणि काळाबरोबर गोष्टी कमी चिंताजनक होतील असे भारताने लोकांना आणि गुंतवणूकदारांना आश्वस्त करणे आवश्यक आहे.

निधी उभारणे झाले सोपे! स्टार्टअप्सना आता गॅरंटीशिवाय मिळेल कर्ज, जाणून घ्या क्रेडिट लिमिट
कर्जाचं ओझं पण भारताची कामगिरी चांगली
IMF एशिया पॅसिफिकचे संचालक कृष्णा श्रीनिवासन म्हणाले की, सर्व देशांची आर्थिक वाढ घसरत आहे पण भारताची प्रगती चांगली होत आहे. ते म्हणाले की २०२२ च्या अखेरीस कर्जाचे प्रमाण जीडीपीच्या ८४ टक्के असू शकते. जगातील अनेक उदयोन्मुख अर्थव्यवस्थांपेक्षा हे प्रमाण जास्त आहे. अनेक देशांच्या आर्थिक विकासाचा वेग मंदावला असताना भारतावर त्याचा परिणाम होत नसून इतरांपेक्षा चांगली कामगिरी होत असल्याचे त्यांनी सांगितले.

सलग ९व्या आठवड्यात परकीय चलन घटले; समजून घ्या अर्थ, अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम काय?
या देशांवर कर्जाचा बोजा
जपानचे कर्ज प्रमाण सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या २३७ टक्के, इटलीचे १३५ टक्के, सिंगापूरचे १२६ टक्के, अमेरिकेचे १०७ टक्के, फ्रान्सचे ९८.१० टक्के, ब्रिटनचे ८०.७० टक्के तर भारताचे ६९.६२ टक्के आहे. याशिवाय पाकिस्तानवरील कर्जाचं प्रमाण ८४.८० टक्के आहे.

कर्जाच्या ओझ्याला सामोरे जावे लागेल
IMF नुसार दरवर्षी जीडीपीच्या १५ टक्के कर्ज घ्यावे लागते. म्हणून कर्ज घेण्याच्या गतीवर लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणूनच सध्या जीडीपीच्या १० टक्के असलेल्या वित्तीय तूटची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. पण भारतासाठी चांगली परिस्थिती अशी आहे की परंपरेने येथील आर्थिक विकासाचा वेग अधिक चांगला राहिला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज