भारतीय 'आत्मनिर्भरता' विसरले; सेल लागताच चीनच्या फोनची तुफान खरेदी
गेल्या महिन्यात देशात चीनविरोधात प्रचंड रोष होता. चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकला जात होता आणि महागड्या असल्या तरी भारतीय वस्तूच घेऊ असं सांगितलं जात होतं. यातच केंद्र सरकारच्या आत्मनिर्भरतेच्या घोषणेमुळे मेड इन इंडियाला मागणी वाढेल असं चित्र होतं. पण चीनच्या स्मार्टफोन कंपन्यांनी ऑफर्स देताच भारतीय ग्राहक त्यावर तुटून पडले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Aug 2020, 9:43 am
नवी दिल्ली : फ्लिपकार्ट आणि अमेझॉन यांच्या नुकत्याच झालेल्या सेलमध्ये चीनचे स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड्सची जोरदार विक्री झाली आहे. भारत-चीन सीमा वादानंतर चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरत होती. पण या ऑनलाइन ऑफर्सने भारतीय ग्राहकांना एवढं आकर्षिक केलंय की आत्मनिर्भरचा नाराही कुणाच्या लक्षात राहिला नाही. आत्मनिर्भरचा नारा दिल्यामुळे चीनच्या कंपन्यांनाही चिंता होती. पण याउलट घडलं आणि फोनच्या विक्रीत दोन अंकी वाढ झाली आहे.
अमेझॉन इंडियाने सांगितलं की, नुकताच लाँच केलेला वनप्लस नॉर्ड स्मार्टफोन हा ६-७ ऑगस्ट या काळात झालेल्या अमेझॉन प्राईम डे सेलमध्ये सर्वाधिक विकलेला स्मार्टफोन असल्याचं अमेझॉननेच सांगितलं आहे. फ्लिपकार्टही स्वातंत्र्य दिन सेल हे ६-१० ऑगस्ट या काळात होतं. अमेझॉन फ्रीडम सेल ८-११ ऑगस्ट या काळात आहे.
भीषण अर्थसंकट; 'या' अर्थतज्ज्ञाचे भाकीत सरकारची झोप उडवणार
रिअलमी इंडियाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांच्या कालावधीच विक्रीत मोठी वाढ झाली. एकूण व्यापारी मूल्य हे ४०० कोटींच्या आसपा असण्याची शक्यता आहे. कंपनीचा वायर्ड इयरफोन हे सर्वाधिक विकलं गेलेलं प्रोडक्ट ठरलं, तर इतर वर्क फ्रॉम होमची प्रोडक्टही मोठ्या प्रमाणात विकली गेल्याचं कंपनीने सांगितलं.
शाओमीच्या चार फोनचेही हजारो मॉडल्स विकले गेले आहेत. तेही काही सेकंदात हे फोन विकले गेले असल्याचं कंपनीने सांगितलं. शाओमी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनू कुमार जैन यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली. चीनचे ब्रँड असलेले अनेक फोन या सेलमध्ये आऊट ऑफ स्टॉक झाले आहेत. याशिवाय ऑफलाइन विक्रीतही वाढ झाल्याचं कंपन्यांचं म्हणणं आहे. काऊंटरपॉईंटच्या रिसर्चनुसार भारतीय बाजारात चीनच्या स्मार्टफोन कंपन्यांचा हिस्सा जानेवारी-मार्चमध्ये ८१ टक्के होता, जो ७२ टक्क्यांवर घसरला आहे.
मनू कुमार जैन यांच्या मते, काही ब्रँड्स हे अवघ्या १५ सेकंदात विकले गेले आणि ग्राहकांना ऑऊट ऑफ स्टॉकचा मेसेज दिसू लागला. दरम्यान, ईटीने मागितलेल्या प्रतिक्रियेला शाओमी, वनप्लस, ओप्पो आणि विवो यांनी प्रतिसाद दिला नाही.
सोने विक्रमी स्तरावर...झटपट कर्जाचा गोल्डन चान्स!
टीसीएल इंडियाचे मॅनेजर माईक चेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या कंपनीचे 4K आणि QLED टीव्ही मॉडल फ्लिपकार्टवर अर्ध्या दिवसातच विकले गेले. गेल्या वर्षीच्या तुलनेत विचार करता यावर्षीच्या जूनमध्ये ४७ टक्के, तर जुलैमध्ये विक्रीत ४० टक्के वाढ झाली आहे. या वर्षातील पहिल्या ६ महिन्यात टीसीएलच्या विक्रीत २० टक्क्यांची वाढ झाल्याचंही चेन यांनी सांगितलं.
एका नामांकीत चीन कंपनीच्या सीईओंनी प्रतिक्रिया दिली की, भारतीयांना योग्य किंमतीत लेटेस्ट तंत्रज्ञान हवं आहे. त्यामुळेच या वस्तूंची लोकप्रियता कायम आहे. या क्षेत्रातील जाणकारांच्या मते, चीनचे ब्रँड फक्त ऑनलाइनच नव्हे, तर ऑफलाइनही आऊट ऑफ स्टॉक झाले आहेत. चीनच्या फोन विक्रीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचं एका अधिकाऱ्याने ईटीला सांगिलं.
बहिष्काराचा डोस कामी आला; चीनला असा बसला झटका!
खरं तर मागणीपेक्षा पुरवठा हा मोठा मुद्दा आहे. फोनचा पुरवठा जास्त असता तर व्यवसायही जास्त झाला असता. चीनच्या ब्रँडला एवढा व्यवसाय होईल याची खात्री नव्हती आणि कस्टम क्लिअरन्स, कंपन्यांमधील सोशल डिस्टन्सिंग या अटींमुळे जून, जुलै महिन्यात फोनची निर्मितीही कमी झाली होती. त्यामुळे मागणी हा मुद्दाच नाही. पुरवठा हा मुद्दा होता, असं या अधिकाऱ्याने सांगितलं.
अमेझॉन इंडियाने सांगितलं की, नुकताच लाँच केलेला वनप्लस नॉर्ड स्मार्टफोन हा ६-७ ऑगस्ट या काळात झालेल्या अमेझॉन प्राईम डे सेलमध्ये सर्वाधिक विकलेला स्मार्टफोन असल्याचं अमेझॉननेच सांगितलं आहे. फ्लिपकार्टही स्वातंत्र्य दिन सेल हे ६-१० ऑगस्ट या काळात होतं. अमेझॉन फ्रीडम सेल ८-११ ऑगस्ट या काळात आहे.
भीषण अर्थसंकट; 'या' अर्थतज्ज्ञाचे भाकीत सरकारची झोप उडवणार
रिअलमी इंडियाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांच्या कालावधीच विक्रीत मोठी वाढ झाली. एकूण व्यापारी मूल्य हे ४०० कोटींच्या आसपा असण्याची शक्यता आहे. कंपनीचा वायर्ड इयरफोन हे सर्वाधिक विकलं गेलेलं प्रोडक्ट ठरलं, तर इतर वर्क फ्रॉम होमची प्रोडक्टही मोठ्या प्रमाणात विकली गेल्याचं कंपनीने सांगितलं.
शाओमीच्या चार फोनचेही हजारो मॉडल्स विकले गेले आहेत. तेही काही सेकंदात हे फोन विकले गेले असल्याचं कंपनीने सांगितलं. शाओमी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनू कुमार जैन यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली. चीनचे ब्रँड असलेले अनेक फोन या सेलमध्ये आऊट ऑफ स्टॉक झाले आहेत. याशिवाय ऑफलाइन विक्रीतही वाढ झाल्याचं कंपन्यांचं म्हणणं आहे. काऊंटरपॉईंटच्या रिसर्चनुसार भारतीय बाजारात चीनच्या स्मार्टफोन कंपन्यांचा हिस्सा जानेवारी-मार्चमध्ये ८१ टक्के होता, जो ७२ टक्क्यांवर घसरला आहे.
मनू कुमार जैन यांच्या मते, काही ब्रँड्स हे अवघ्या १५ सेकंदात विकले गेले आणि ग्राहकांना ऑऊट ऑफ स्टॉकचा मेसेज दिसू लागला. दरम्यान, ईटीने मागितलेल्या प्रतिक्रियेला शाओमी, वनप्लस, ओप्पो आणि विवो यांनी प्रतिसाद दिला नाही.
सोने विक्रमी स्तरावर...झटपट कर्जाचा गोल्डन चान्स!
टीसीएल इंडियाचे मॅनेजर माईक चेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या कंपनीचे 4K आणि QLED टीव्ही मॉडल फ्लिपकार्टवर अर्ध्या दिवसातच विकले गेले. गेल्या वर्षीच्या तुलनेत विचार करता यावर्षीच्या जूनमध्ये ४७ टक्के, तर जुलैमध्ये विक्रीत ४० टक्के वाढ झाली आहे. या वर्षातील पहिल्या ६ महिन्यात टीसीएलच्या विक्रीत २० टक्क्यांची वाढ झाल्याचंही चेन यांनी सांगितलं.
एका नामांकीत चीन कंपनीच्या सीईओंनी प्रतिक्रिया दिली की, भारतीयांना योग्य किंमतीत लेटेस्ट तंत्रज्ञान हवं आहे. त्यामुळेच या वस्तूंची लोकप्रियता कायम आहे. या क्षेत्रातील जाणकारांच्या मते, चीनचे ब्रँड फक्त ऑनलाइनच नव्हे, तर ऑफलाइनही आऊट ऑफ स्टॉक झाले आहेत. चीनच्या फोन विक्रीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचं एका अधिकाऱ्याने ईटीला सांगिलं.
बहिष्काराचा डोस कामी आला; चीनला असा बसला झटका!
खरं तर मागणीपेक्षा पुरवठा हा मोठा मुद्दा आहे. फोनचा पुरवठा जास्त असता तर व्यवसायही जास्त झाला असता. चीनच्या ब्रँडला एवढा व्यवसाय होईल याची खात्री नव्हती आणि कस्टम क्लिअरन्स, कंपन्यांमधील सोशल डिस्टन्सिंग या अटींमुळे जून, जुलै महिन्यात फोनची निर्मितीही कमी झाली होती. त्यामुळे मागणी हा मुद्दाच नाही. पुरवठा हा मुद्दा होता, असं या अधिकाऱ्याने सांगितलं.