अ‍ॅपशहर

महागाईने रडकुंडीला आणलं! साखर, दूध, तांदळाने नागरिकांचे 'तेल' काढले; पाहा काय आहेत दर

Inflation Rate in India: गेल्या महिन्याभरात जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किंमतींनी सर्वसामान्यांना हैराण केले आहे. एकीकडे रिझर्व्ह बँकेने महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रेपो दरांत सातत्याने वाढ केली तर बँकांनी देखील केंद्रीय बँकेचे अनुसरण करत व्याजदरात वाढ केली आहे. यादरम्यान, रोजच्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींनी ग्राहकांना घाम फोडला असताना. काही प्रमाणात बटाटे आणि टोमॅटोने महागाईने होरपळणाऱ्या जनतेचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Dec 2022, 2:16 pm
नवी दिल्ली: महिन्याभरात जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतींनी सर्वसामान्यांचं 'तेल' काढलं आहे. यादरम्यान, काही प्रमाणात बटाटे आणि टोमॅटोने महागाईने होरपळणाऱ्या जनतेचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला आहे, पण तो देखील पुरेसा नाही कारण कांदा तुम्हाला पुन्हा रडवायला तयार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Inflation in Last One Month


ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाइटवर दिलेल्या आकडेवारीनुसार, ३० ऑक्टोबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत गव्हाचे पीठ ५.२४ टक्क्यांनी महागले आणि ३६.९७ रुपये प्रति किलोवर पोहोचले. त्याच वेळी, या कालावधीत तांदळाच्या दरात १.२७ टक्के वाढ झाली आहे. तसेच गव्हाचा भाव ४.८१ टक्क्यांनी वाढून ३१.८३ रुपये झाला आहे.

ब्रिटनमध्ये महागाईने कंबरडे मोडले; सर्वसामान्य नव्हे तर सरकारवर देखील आली अशी वेळ
याशिवाय महिनाभरात डाळींचे दरही गगनात पोहोचले. चनाडाळीची सरासरी किंमत ३.७२ टक्क्यांनी वाढून ७३.८१ रुपये झाली तर अरहर डाळही २.१२ टक्क्यांनी महागून ११२.९० रुपये किलो झाली आहे. या कालावधीत मूग डाळीच्या दरात १.८३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एवढेच नाही तर मसूर डाळही महागली आहे.

अमेरिकेतील महागाईबाबत आनंदाची बातमी, भारतासह संपूर्ण जगावर होणार परिणाम, वाचा नेमकं घडलं तरी काय
साखर, दूध, गूळही महाग
दरम्यान, सर्वसामान्यांच्या नित्य-नियमचहाही महागला कारण साखर आणि दुधाचे दर वाढले. गेल्या एका महिन्यात दुधाचे दर ३.८० टक्क्यांनी वाढून ५५.६९ रुपयांवर पोहोचले आहेत. या कालावधीत साखरही २.०६ टक्क्यांनी महागली असून ४२.६८ रुपयांवर पोहोचली आहे. त्याचबरोबर गुळाचा दरही १.८९ टक्क्यांनी वाढून ५०.६५ रुपये झाला.

RBI, सरकारला दिलासा; ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाईत घटली, भाजीपाला, डाळींचे भाव कमी झाले
खाद्यतेलाच्या किमती कडाडल्या
महागाईच्या वणव्यात खाद्यतेलेही उकळत आहेत. मोहरीचे तेल एका महिन्यात सरासरी १.१९ टक्क्यांनी वाढून १७०.६६ रुपयांनी महागले आहे, तर वनस्पति तेल ३.०३ टक्क्यांनी वाढून १४४.८२ रुपयांवर पोहोचले आहे. तसेच सोया तेलात २.९२ टक्के वाढ झाली, तर सूर्यफूल तेल २.३६ टक्क्यांनी महागले आहे. पामतेलही ०.९२ टक्क्यांनी महागून ११७.१७ रुपयांवर पोहोचले आहे.

बटाटा-टोमॅटोचे अश्रू पुसलेमहागाईच्या वणव्यात गुंतवणूकदारांना काहीसा देखील मिळाला आहे. गेल्या महिनाभरात बहुतांश जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले असताना बटाटे आणि टोमॅटोचे भाव मात्र घसरले आहेत. बटाट्याचा दर २.८३ टक्क्यांनी घसरला असून आता सरासरी २७.८४ रुपये प्रतिकिलो इतका खाली घसरला आहे. तर टोमॅटोचे दर २३ टक्क्यांहून अधिक कमी आहे. मात्र या काळात कांद्याच्या भावात सुमारे ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज