अ‍ॅपशहर

महागाई दर कमी असणे हिताचे

महागाई दर सातत्याने कमी राहिला तरच व्याजदरांची रचना योग्य प्रकारे करता येईल, तसेच अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी गुंतवणूकही वाढवता येईल, असे रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांनी बुधवारी येथे सांगितले.

Maharashtra Times 12 Jan 2017, 3:00 am
वृत्तसंस्था, गांधीनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम inflation must be reduced
महागाई दर कमी असणे हिताचे


महागाई दर सातत्याने कमी राहिला तरच व्याजदरांची रचना योग्य प्रकारे करता येईल, तसेच अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी गुंतवणूकही वाढवता येईल, असे रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांनी बुधवारी येथे सांगितले. व्हायब्रन्ट गुजरात परिषदेत ते बोलत होते.

आरबीआयने महागाई दराचे ४ टक्के लक्ष्य ठेवले आहे. ही पातळी गाठण्यासाठी वस्तूंच्या किमती नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. त्याचवेळी गुंतवणूकदाराने केलेल्या गुंतवणुकीवर त्याला चांगला परतावा मिळण्यासाठीही महागाई दर कमी असणे उपयुक्त आहे, याकडे डॉ. पटेल यांनी लक्ष वेधले.

वित्तीय तूट कमी करणे हेदेखील गरजेचे असून, वित्तीय तूट कमी झाल्यास अर्थव्यवस्थेतील जोखमीचे प्रभावी व्यवस्थापन करता येईल. त्यामुळे आर्थिक चढउतार कमी होण्यासही मदत मिळेल. अर्थव्यवस्थेत पैसा खेळता राहण्यासाठी सरकारी बँकांना नियमित तत्त्वावर भांडवलाचा पुरवठा होणे महत्त्वाचे आहे, यावरही डॉ. पटेल यांनी भर दिला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज