वृत्तसंस्था, मुंबई
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या पहिल्या अर्थसंकल्पावर सकारात्मक प्रतिक्रिया उमटत असतानाच शेअर बाजाराने मात्र या अर्थसंकल्पास नापसंती दर्शवली आहे. आठवड्याच्या सुरुवातीच्या सत्रात अर्थसंकल्पाविषयी आश्वासक वातावरण निर्माण झाल्याने निर्देशांक वधारले होते. मात्र पेट्रोल, डिझेलवर नव्याने आकारण्यात येणारा प्रत्येकी एक रुपयाचा उपकर व सोन्यावरील सीमाशुल्कात झालेली अडीच टक्क्यांची वाढ निर्देशांकासाठी मारक ठरली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३९४ अंकांनी घसरून दिवसअखेरीस ३९५१३वर स्थिरावला. तर, १३५ अंकांनी घसरलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाने ११८११चा स्तर गाठला.
चालू आठवड्याच्या चार सत्रांमध्ये निर्देशांकांनी चांगली कमाई केली होती. मात्र अर्थसंकल्पामुळे गुंतवणूकदारांची काहीशी निराशा झाल्याचे दिसून आले. यामुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर समभागविक्री केली. गेले काही दिवस सतत गटांगळ्या खाणाऱ्या येस बँकेला सर्वाधिक फटका बसला. या बँकेचे समभाग ८.३६ टक्क्यांनी घसरले. याशिवाय एटीपीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, वेदांता, सन फार्मा, टीसीएस हे समभागही ४.८१ टक्क्यांनी घसरले.
इंडसइंड बँक, कोटक बँक, स्टेट बँक, आयटीसी, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक आदींचे समभाग मात्र २.१६ टक्क्यांनी वधारले.
प्रवर्तकांचे भांडवल घटणार
कंपन्यांमध्ये असणारे खुल्या बाजारातील भांडवल २५ टक्क्यांवरून ३५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची हीच योग्य वेळ आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात केली. या घोषणेची अंमलबजावणी झाल्यास ३५ टक्क्यांचे प्रमाण राखण्यासाठी कंपन्यांच्या प्रवर्तकांना स्वत:च्या मालकीचे समभाग काही प्रमाणात खुले करावे लागतील. सर्व सूचिबद्ध कंपन्यांच्या प्रवर्तकांचे शेअर बाजारांतील एकूण भांडवल ३.८७ लाख कोटी रुपये आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या पहिल्या अर्थसंकल्पावर सकारात्मक प्रतिक्रिया उमटत असतानाच शेअर बाजाराने मात्र या अर्थसंकल्पास नापसंती दर्शवली आहे. आठवड्याच्या सुरुवातीच्या सत्रात अर्थसंकल्पाविषयी आश्वासक वातावरण निर्माण झाल्याने निर्देशांक वधारले होते. मात्र पेट्रोल, डिझेलवर नव्याने आकारण्यात येणारा प्रत्येकी एक रुपयाचा उपकर व सोन्यावरील सीमाशुल्कात झालेली अडीच टक्क्यांची वाढ निर्देशांकासाठी मारक ठरली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३९४ अंकांनी घसरून दिवसअखेरीस ३९५१३वर स्थिरावला. तर, १३५ अंकांनी घसरलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाने ११८११चा स्तर गाठला.
चालू आठवड्याच्या चार सत्रांमध्ये निर्देशांकांनी चांगली कमाई केली होती. मात्र अर्थसंकल्पामुळे गुंतवणूकदारांची काहीशी निराशा झाल्याचे दिसून आले. यामुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर समभागविक्री केली. गेले काही दिवस सतत गटांगळ्या खाणाऱ्या येस बँकेला सर्वाधिक फटका बसला. या बँकेचे समभाग ८.३६ टक्क्यांनी घसरले. याशिवाय एटीपीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, वेदांता, सन फार्मा, टीसीएस हे समभागही ४.८१ टक्क्यांनी घसरले.
इंडसइंड बँक, कोटक बँक, स्टेट बँक, आयटीसी, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक आदींचे समभाग मात्र २.१६ टक्क्यांनी वधारले.
प्रवर्तकांचे भांडवल घटणार
कंपन्यांमध्ये असणारे खुल्या बाजारातील भांडवल २५ टक्क्यांवरून ३५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची हीच योग्य वेळ आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात केली. या घोषणेची अंमलबजावणी झाल्यास ३५ टक्क्यांचे प्रमाण राखण्यासाठी कंपन्यांच्या प्रवर्तकांना स्वत:च्या मालकीचे समभाग काही प्रमाणात खुले करावे लागतील. सर्व सूचिबद्ध कंपन्यांच्या प्रवर्तकांचे शेअर बाजारांतील एकूण भांडवल ३.८७ लाख कोटी रुपये आहे.